शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

प्रत्येक आजारांच्या निदानासाठी दर आठवड्याला विशेष आरोग्य मोहीम

By हरी मोकाशे | Updated: September 1, 2023 17:31 IST

केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव उपक्रम

लातूर : ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर आरोग्यसेवा मिळावी तसेच त्यांच्यात आजारासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भव मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दर आठवड्यास विविध आजारासंदर्भात आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत आयुष्मान भव ही मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य सेवा खेड्यापाड्यातील, तांड्यावरील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शिवाय, आरोग्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची तपासणी केली जाणार आहे.

आयुष्मान कार्डसाठीच्या लाभार्थ्यांची नोंदणी व कार्ड वितरण, आरोग्य सेवा- सुविधांची आणि आभा कार्डची जनजागृती, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी अथवा रविवारी विशेष आरोग्य शिबीर, तसेच ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

पहिल्यांदा असांसर्गिक आजारांची तपासणी...

आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील विशेष दिनी मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब अशा असांसर्गिक आजारांची तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या आठवड्यात कुष्ठरोग, क्षयरोग व इतर सांसर्गिक आजारांची, तिसऱ्या आठवड्यामध्ये माता व बालक तसेच पोषण आहार आणि लसीकरणाची माहिती देऊन उपक्रम राबविले जाणार आहेत. चौथ्या आठवड्यात कान- नाक- घसा व इतर आरोग्यसेवांसाठी शिबीर होणार आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची मदत घेण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी २२५ गावांत उपक्रम...केंद्र शासनाची आयुष्मान भव ही नवी मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील २२५ गावांमध्ये आरोग्याच्या जनजागृतीबरोबरच तपासणी शिबीर घेण्यात आले. तसेच औषधोपचार देण्यात आले आहेत.

अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम...

केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भव ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम चार महिने राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्यासंदर्भात जनजागृती, तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य