शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

प्रत्येक आजारांच्या निदानासाठी दर आठवड्याला विशेष आरोग्य मोहीम

By हरी मोकाशे | Updated: September 1, 2023 17:31 IST

केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव उपक्रम

लातूर : ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर आरोग्यसेवा मिळावी तसेच त्यांच्यात आजारासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भव मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दर आठवड्यास विविध आजारासंदर्भात आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत आयुष्मान भव ही मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य सेवा खेड्यापाड्यातील, तांड्यावरील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शिवाय, आरोग्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची तपासणी केली जाणार आहे.

आयुष्मान कार्डसाठीच्या लाभार्थ्यांची नोंदणी व कार्ड वितरण, आरोग्य सेवा- सुविधांची आणि आभा कार्डची जनजागृती, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी अथवा रविवारी विशेष आरोग्य शिबीर, तसेच ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

पहिल्यांदा असांसर्गिक आजारांची तपासणी...

आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील विशेष दिनी मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब अशा असांसर्गिक आजारांची तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या आठवड्यात कुष्ठरोग, क्षयरोग व इतर सांसर्गिक आजारांची, तिसऱ्या आठवड्यामध्ये माता व बालक तसेच पोषण आहार आणि लसीकरणाची माहिती देऊन उपक्रम राबविले जाणार आहेत. चौथ्या आठवड्यात कान- नाक- घसा व इतर आरोग्यसेवांसाठी शिबीर होणार आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची मदत घेण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी २२५ गावांत उपक्रम...केंद्र शासनाची आयुष्मान भव ही नवी मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील २२५ गावांमध्ये आरोग्याच्या जनजागृतीबरोबरच तपासणी शिबीर घेण्यात आले. तसेच औषधोपचार देण्यात आले आहेत.

अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम...

केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भव ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम चार महिने राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्यासंदर्भात जनजागृती, तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य