शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे सोयाबीन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात चार दिवसांपासून सतत हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे काढणीस ...

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात चार दिवसांपासून सतत हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे काढणीस आलेले सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. तसेच बाजारपेठेत दरही घसरल्याने चिंता वाढली आहे.

औराद शहाजानी कृषी मंडळात यंदा जवळपास ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर साेयाबीनचा पेरा झाला आहे. दोन टप्प्यांत पेरणी झाली. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने पिकांची शाकीय वाढ व्यवस्थित झाली नाही. त्यानंतर पाऊस सुरू होऊन अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत असताना चार दिवसांपासून सतत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. गुरुवारी दिवसभर झडीचा पाऊस होता. या पावसामुळे उभ्या सोयाबीनला शेंगा फुटत आहेत. त्यामुळे हाता- तोंडाशी आलेले पीक निसर्गामुळे हिरावले जात आहे.

दरम्यान, बाजारपेठेत ११ हजारांपर्यंत पोहोचलेले सोयाबीनचे दर चार दिवसांत एकदम कोसळले आहेत. ४ हजार ६०० ते ६ हजारांच्या दरम्यान दर आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसाने उघडीप दिल्यास सोयाबीनचे होणारे नुकसान टळणार आहे.

दरम्यान, औराद परिसरातील मांजरा व तेरणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांवरील सर्व उच्चस्तरीय बंधारे, परिसरातील लहान-मोठे लघू तलाव पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी ओढा, नाल्याने नदी पात्रात वाहत येत आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेरणा नदीवरील औरादसह इतर बंधाऱ्यांची दारे उघडण्यात आली आहेत. दाेन्ही नद्यांचे पाणी संगमावर पसरले आहे. गुरुवारी रात्री पुन्हा जाेरदार पाऊस झाला असून, येथील हवामान केंद्रावर ६० मिमी पावसाची नाेंद झाली आहे.

सप्टेंबरमध्येच वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. महिना अखेरीस कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेऊन पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. एकीकडे साेयाबीन दर घसरले आहेत तर दुसरीकडे हाता-तोंडाशी आलेले पीक पाऊस काढू देत नाही.

उतारा ५० टक्क्यांनी घटला...

मी बागायतदार शेतकरी हाेताे. सततच्या कमी-जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बागायती क्षेत्र मोडून आठ बॅग साेयाबीनची पेरणी केली. ऐन फळधारणेच्या कालावधीत पावसाने उघडीप दिली. आता काढणीवेळी सतत पाऊस होत आहे. त्यामुळे यंदा उतारा ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत राहणार आहे. पावसाने उघडीप दिली तर त्याची तूट भावात भरून निघेल, अशी अपेक्षा हाेती. परंतु, दर घसरल्याने संकट निर्माण झाले आहे. तसेच दाेन एकरवर टोमॅटो होते. परंतु, बाजारात भाव मिळाला नाही. त्याचा उताराही ४० टक्क्यांनी घटला आहे.

- ओमकार मरगणे, शेतकरी.