शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

महाबीजकडून सोयाबीन बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST

लातूर : सोयाबीन बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत महाबीज कंपनीकडून लूट होत आहे. बाजारात सोयाबीनचे दर ...

लातूर : सोयाबीन बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत महाबीज कंपनीकडून लूट होत आहे. बाजारात सोयाबीनचे दर सात हजार रुपयांवर पोहोचलेले असताना महाबीज कंपनी मात्र बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार शंभर रुपये याप्रमाणे दर देत आहे. एक तर महाबीज कंपनीने बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीनला दर द्यावा किंवा शेतकऱ्यांनी पिकवलेले सोयाबीन त्यांना परत द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

महाबीजकडून दरवर्षी बियाणे तयार करण्यासाठी ठराविक शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन करून त्यांना अपेक्षित पद्धतीने मशागत करून घेतात. सदरील सोयाबीन खरेदीचा करार केला जातो. काढणीनंतर संबंधित शेतकरी महाबीज कंपनीच्या गोदामात सोयाबीन आणून देतात. त्यावेळी वजन करून ७० टक्के रक्कम दिली जाते. बियाणांची उगवण क्षमता तपासणी करून सदरील बियाणे चाळणी करून घेतले जाते. यावर्षी खरीप हंगामात महाबीजने शेतकऱ्यांना पाच हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर करार करून घेतला. आता त्याचे माप केले जात असून, चाळणीतून गाळलेले बियाणे परत दिले जात आहे. सध्या बाजारात सोयाबीनचा दर सात हजार रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. त्यामुळे महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना चालू बाजार भावाप्रमाणे पैसे द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाबीज व्यवस्थापकाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, युवा जिल्हाध्यक्ष नवनाथ शिंदे उपस्थित होते.

बियाणेपेक्षा मातेरे महाग...

महाबीज कंपनीने आमच्याकडून घेतलेल्या बियाणांची चाळणी करून मोजणी सुरू केली आहे. त्यात चाळून निघणारे मातेरे बाजारात सात हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे. बियाणं म्हणून एक नंबर सोयाबीन पाच हजार १०० रुपयाने घेतले जात आहे. यात आमचे क्विंटलला जवळपास दोन हजारांचे नुकसान होत आहे, महाबीजने चालू बाजार भाव द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला आहे.