शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

लातूर जिल्ह्यात सहा लाख ४१ हेक्टरवर खरिपाची पेरणी; शेतकऱ्यांचे सोयाबीन, तुरीला प्राधान्य

By हणमंत गायकवाड | Updated: May 17, 2023 14:24 IST

सर्वाधिक ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा तर ९० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा होण्याची शक्यता

लातूर: जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरीप हंगामाच्या अनुषंगाने पूर्व तयारी करण्यात येत असून यंदा ६ लाख ४१ हजार २५० हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा तर ९० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा होण्याची शक्यता आहे.

सोयाबीनच्या पेरणीसाठी तीन लाख ६७ हजार बियाणे आवश्यक आहेत. शेतकऱ्यांकडे पाच लाख १९ हजार ६०० क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध आहे. बियाणे बदलासाठी आवश्यक एक लाख २८ हजार ४५० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित पिकांचेही बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विकास अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत दिली. एक लाख १२ हजार मॅट्रिक टन खत मंजूर.... गतवर्षी खरीप हंगामात एक लाख पाच हजार पाचशे पंच्याहत्तर मॅट्रिक टन खताचा वापर झाला होता.

खरीप हंगामामध्ये सरासरी ९० हजार ५८१ मॅट्रिक टन खताचा वापर होतो. यावर्षीही एक लाख १२ हजार २६० मॅट्रिक टन खत मंजूर झालेला आहेः महिनानिहाय त्याचे वितरण केले जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन.... ननो युरिया प्रमाणे न्यानो डीएपी खताचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. बोगस बियाणे खतांची विक्री रोखण्यासाठी गुण नियंत्रण पथकामार्फत आवश्यक कारवाई केली जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा आणि विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच राज्यस्तरावर टोल फ्री हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :laturलातूरagricultureशेतीFarmerशेतकरी