शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात ६७ प्रकल्पांतून गाळ उपसा; ३१० कोटी लिटर जलसंचय वाढणार

By हरी मोकाशे | Updated: June 10, 2024 12:22 IST

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार : पावसाचे वाहून जाणारे पाणी थांबणार

लातूर : पावसाच्या वाहत्या पाण्याचा शेती, पिण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून सिंचन प्रकल्प आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्यात आला नसल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ६७ प्रकल्पांतून ३० लाख ४७ हजार ९४० घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याने ३१० कोटी लिटर जलसंचय वाढणार आहे.

जिल्ह्यात ८ मध्यम प्रकल्प, १३४ लघु प्रकल्प तसेच बॅरेजेस, तलाव आहेत. त्यामुळे जलसाठा होण्यास मदत होत असली तरी गेल्या काही वर्षांत प्रकल्पांत गाळ मोठ्या प्रमाणात साठला. दरम्यान, गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७३ टक्के पाऊस झाल्याने आणि यंदा उन्हाची अधिक तीव्रता असल्याने बहुतांश प्रकल्प मार्चअखेरपासून आटण्यास सुरुवात झाली. येत्या पावसाळ्यात प्रकल्पांची जलसंचय क्षमता वाढावी म्हणून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहीम जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली.

शिरुर अनंतपाळात सर्वाधिक गाळ उपसा...शिरुर अनंतपाळ तालुक्यात घरणी आणि साकोळ मध्यम प्रकल्प आहेत. त्यामुळे मोहिमेअंतर्गत ९,३०,७५० घनमीटर असा सर्वाधिक गाळ उपसा या तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ रेणापुरात ५,५४,२१८ घनमीटर गाळ उपसा झाला आहे. सर्वात कमी गाळ उपसा निलंगा तालुक्यात झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मोहिमेस गती...मेच्या मध्यावधीपर्यंत केवळ १० लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला होता. दरम्यान, यंदाचा उन्हाळा गाळ उपसा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे पाहून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी या मोहिमेस गती दिली. त्यांनी स्वत: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत गाळ उपसा करण्याचे आवाहन केले. त्यासाठी दोन दिवस गाळमुक्तीचे, लातूरच्या विकासाचे हा अनोखा उपक्रमही राबविला. त्यामुळे केवळ १५ दिवसांत २० लाख घनमीटर गाळ उपसा झाला आहे.

साडेसात हजार एकर जमीन सुपिक...योजना, लोकसहभागातून एकूण ३० लाख ४७ हजार घनमीटर गाळसा करण्यात येऊन तो शेतकऱ्यांनी आपल्या खडकाळ, कमी प्रतिच्या जमिनीवर टाकला. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत झाली असून शेती उत्पादनात वाढ होणार आहे. त्याचबरोबर ३१० कोटी लिटर जलसंचय वाढणार आहे.

दुष्काळावर मात करण्यास मदत...जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गाळमुक्त धरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यामुळे जमीन सुपिक होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. त्याचबरोबर जलसंचय वाढणार असल्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे. याशिवाय, विहीर, बोअरच्या पाणीपातळी वाढ होऊन शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होणार आहे.- ए. एस. कांबळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी.

३० लाख ४७ हजार घनमीटर गाळ उपसा...तालुका - गाळ उपसाअहमदपूर - ३,७४,२९९औसा - ४,८१,११४चाकूर - ७३,०५०देवणी - ६२,४२८जळकोट - ५०,३२१लातूर - १,४८,५८२निलंगा - २३,०००रेणापूर - ५,५४,२१८शिरुर अनं. - ९,३०,७५०उदगीर -३,५०,१७८एकूण - ३०,४७,९४०

टॅग्स :laturलातूरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र