शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

लातुरात मायेस पोरखे असलेल्या तीन लेकींच्या बांधल्या रेशीमगाठी

By हरी मोकाशे | Updated: January 6, 2024 20:31 IST

बुधोड्याच्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने विवाह सोहळा

लातूर : आई- वडिलांच्या मायेस पोरखे असलेल्या तीन लेकींच्या रेशीमगाठी बुधोड्याच्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानने बांधल्या. गेली काही वर्षे येथे राहून शिक्षण, प्रशिक्षण घेतलेल्या या लेकी सासरी जाताना एका डोळ्यात विरहाचे तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते. वऱ्हाडी मंडळींचेही डोळे पाणवले होते.

औसा तालुक्यातील बुधोडा येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने ४२ वर्षांपासून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उपक्रम राबविण्यात येत आहे. या केंद्रात समाजातील उपेक्षित व्यक्तीस स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य केेले जाते. एक- दीड वर्षापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या एका अनाथ मुलीचे पालकत्व महिला व बालकल्याण विभागाकडून प्रतिष्ठानने घेतले होते. तिला शिलाई मशीनचे प्रशिक्षण दिले. तसेच काही वर्षांपासून येथे दाखल असलेली अनाथ मूकबधीर त्याचबरोबर आई- वडिलांचे छत्र हरवलेली एकजण स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेत होती.

या तिन्ही मुलींच्या विवाहासाठी संस्थेच्या वतीने उपवर शोधण्यास सुरुवात झाली होती. अखेर त्यास यश आले आणि उपवरांच्या कुटुंबियांशी भेटीगाठी झाली. त्यांच्या सहमतीने शनिवारी दुपारी तिन्ही वधू- वरांच्या विधीवत पध्दतीने रेशीमगाठी बांधण्यात आल्या. यावेळी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, बी.ए. मैंदर्गी, प्राचार्या विना कोपकर, दरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रमुख हरिश्चंद्र सुडे, कमलाकर सावंत, रविचंद्र वंजारे, वैशाली राठोड, शिवशंकर बरबडे आदींनी परिश्रम घेतले.

आतापर्यंत ६० दिव्यांगांचे शुभमंगल...ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने अनाथांना स्वयंरोजगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर शासनाच्या कुठल्याही मदतीविना तसेच लोकसहभागाविना परंपरेनुसार विवाह लावण्यात येतो. आतापर्यंत ६० दिव्यांगांचे शुभमंगल झाले आहे. ते आनंदाने आपला संसार करीत आहेत.

पुनर्वसनाचा प्रयत्न...समाजातील वंचितांना मदत केल्यास सर्वजण सुखी राहतात. शासनाकडून अल्पवयीन अनाथ बालकांना आधार दिला जातो. मात्र, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पुनर्वसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे.- हरिश्चंद्र सुडे.

 

टॅग्स :marriageलग्नlaturलातूर