शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लातुरात मायेस पोरखे असलेल्या तीन लेकींच्या बांधल्या रेशीमगाठी

By हरी मोकाशे | Updated: January 6, 2024 20:31 IST

बुधोड्याच्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने विवाह सोहळा

लातूर : आई- वडिलांच्या मायेस पोरखे असलेल्या तीन लेकींच्या रेशीमगाठी बुधोड्याच्या ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानने बांधल्या. गेली काही वर्षे येथे राहून शिक्षण, प्रशिक्षण घेतलेल्या या लेकी सासरी जाताना एका डोळ्यात विरहाचे तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते. वऱ्हाडी मंडळींचेही डोळे पाणवले होते.

औसा तालुक्यातील बुधोडा येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने ४२ वर्षांपासून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उपक्रम राबविण्यात येत आहे. या केंद्रात समाजातील उपेक्षित व्यक्तीस स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य केेले जाते. एक- दीड वर्षापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या एका अनाथ मुलीचे पालकत्व महिला व बालकल्याण विभागाकडून प्रतिष्ठानने घेतले होते. तिला शिलाई मशीनचे प्रशिक्षण दिले. तसेच काही वर्षांपासून येथे दाखल असलेली अनाथ मूकबधीर त्याचबरोबर आई- वडिलांचे छत्र हरवलेली एकजण स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेत होती.

या तिन्ही मुलींच्या विवाहासाठी संस्थेच्या वतीने उपवर शोधण्यास सुरुवात झाली होती. अखेर त्यास यश आले आणि उपवरांच्या कुटुंबियांशी भेटीगाठी झाली. त्यांच्या सहमतीने शनिवारी दुपारी तिन्ही वधू- वरांच्या विधीवत पध्दतीने रेशीमगाठी बांधण्यात आल्या. यावेळी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, बी.ए. मैंदर्गी, प्राचार्या विना कोपकर, दरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रमुख हरिश्चंद्र सुडे, कमलाकर सावंत, रविचंद्र वंजारे, वैशाली राठोड, शिवशंकर बरबडे आदींनी परिश्रम घेतले.

आतापर्यंत ६० दिव्यांगांचे शुभमंगल...ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने अनाथांना स्वयंरोजगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर शासनाच्या कुठल्याही मदतीविना तसेच लोकसहभागाविना परंपरेनुसार विवाह लावण्यात येतो. आतापर्यंत ६० दिव्यांगांचे शुभमंगल झाले आहे. ते आनंदाने आपला संसार करीत आहेत.

पुनर्वसनाचा प्रयत्न...समाजातील वंचितांना मदत केल्यास सर्वजण सुखी राहतात. शासनाकडून अल्पवयीन अनाथ बालकांना आधार दिला जातो. मात्र, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पुनर्वसनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे.- हरिश्चंद्र सुडे.

 

टॅग्स :marriageलग्नlaturलातूर