रोषाचा सामाना आम्हाला करावा लागतो...
मागील अनेक वर्षांपासून रिक्तपदे भरण्यात आलेली नाहीत. पदोन्नतीही रखडली आहे. अपु-या कर्मचा-यांवर काम करताना अडचण होत आहे. सर्व्हरमध्ये वारंवार अडचणी येतात, त्यामुळे नागरिकांचा रोष आम्हाला सहन करावा लागतो. त्यामुळे रखडलेल्या मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आल्याचे प्रभारी सह दुय्यम निबंधक १ सतीश बनसोडे यांनी सांगितले.
जाचक परिपत्रक रद्द करा...
मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षकांनी १२ जुलै रोजी काढलेले जाचक परिपत्रक रद्द करावे, या मागणीसाठी समस्त लातूरकर संघर्ष समितीच्या वतीने सोमवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दस्त नोंदणीसाठी अंतिम रेखांकन मंजुरी असल्याशिवाय रजिस्ट्री होणार नाही, असे परिपत्रक असल्याने याला विरोध होत आहे. आजपर्यंत ज्या मुद्रांक नोंदणी कायद्यानुसार मालमत्तेचे खरेदीखत प्लॉटिंग पडल्यापासून आजपर्यंत अनेकदा त्या मालमत्तेचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आहे. त्याचा महसूल शासनाने अनेकदा घेतला. या मालमत्तेशी निगडित ग्रामपंचायत, महानगरपालिका, सिटी सर्वे, तहसील, एनए आदी ठिकाणी वारंवार महसूल भरून घेतला आहे. अशा लोकांना पुन्हा वेठीस धरण्याचे काम होत आहे. मुद्रांक नोंदणी विभागातील परिपत्रकातील नमूद केलेल्या मंजूर रेखांकन करण्यासाठी लातुरातील ८० टक्के मालमत्ताधारकांना खूप मोठ्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे समस्त लातूरकर संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे.