शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

निलंग्यात स्थानिक नेत्यांना धक्का, तरुणाईला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निलंगा : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून, त्यात स्थानिक नेतेमंडळींना धक्का देत मतदारांनी तरुणाईला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निलंगा : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून, त्यात स्थानिक नेतेमंडळींना धक्का देत मतदारांनी तरुणाईला पसंती दिली आहे. तालुक्यात भाजप, काँग्रेसला मतदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.

कासारशिरशी ग्रामपंचायतीमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांचे समर्थक असलेले पंचायत समिती सदस्य जिलानी बागवान यांच्या पॅनेलचा पराभव झाला. विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांच्या अंबुलगा बु. गटातील ८ पैकी ७ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्या पत्नी संतोषीबाई लातूरे यांचा बालकुंदा ग्रामपंचायतीत पराभव झाला आहे. तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे यांच्या तगरखेडा येथील पॅनेलचा पराभव झाला आहे. होसूर येथील भाजप जिल्हा संघटक तानाजी बिरादार यांच्या पॅनेलला मतदारांनी नाकारले. याठिकाणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांचा विजय झाला आहे.

हासुरी गटाच्या सदस्या अरूणा बरमदे यांच्या पॅनेलचा पराभव झाला असून, भाजपचे जेष्ठ सावरी येथील कुमार पाटील यांनी विजय मिळवला आहे. शिऊर ग्रामपंचायतीमध्ये भाजप अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अमीर पटेल यांच्या पॅनेलचा विजय झाला. लांबोटा येथे दहा वर्षांपूर्वी बिनविरोध ग्रामपंचायत आणलेल्या भाजपचे कट्टर समर्थक लालासाहेब देशमुख यांच्या पत्नीला व त्यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला. त्याच गावातील काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य महेश देशमुख यांच्या पॅनेलचा विजय झाला. विशेष म्हणजे महेश देशमुख व लालासाहेब देशमुख हे पंचायत समिती निवडणुकीत आमने-सामने होते. तेव्हाही महेश देशमुख यांनी लालासाहेब देशमुख यांचा पराभव केला होता.

हाडगा येथील सर्वपक्षीय पॅनेलचे प्रशांत वाघमारे यांच्या पॅनेलचा विजय झाला असून, त्याठिकाणी काँग्रेसचे तानाजी डोके यांचा पराभव झाला आहे. तालुक्यातील लक्षवेधी असलेल्या औराद शहाजानी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे मोहन भंडारे यांनी आपली अनेक वर्षांची सत्ता कायम ठेवत दणदणीत विजय मिळवला आहे. शिरोळ वा. येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गुंडेराव जाधव यांच्या पॅनेलचा विजय झाला.

माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांचे दत्तक गाव ताडमुगळी येथे भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. माजी पंचायत समिती उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे यांना आपला गड राखण्यात यश मिळाले आहे. या निवडणुकीत मोठे परिवर्तन झाले असून, नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांना डावलून मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ४८ पैकी ३७ ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवल्याचा दावा भाजपचे अरविंद पाटील-निलंगेकर यांनी केला आहे. तर मतदार संघातील ७० ते ८० टक्के ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याचे काँग्रेसचे अभय सोळुंके म्हणाले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी २८ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याचे सांगितले.