शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अल्पवयीन मुलीचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST

किल्लारी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नणंद गावातील एका अल्पवयीन मुलीच्या मागे काही वर्षांपासून प्रेमाचा तगादा लावून, लग्न करण्यासाठी पळून ...

किल्लारी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नणंद गावातील एका अल्पवयीन मुलीच्या मागे काही वर्षांपासून प्रेमाचा तगादा लावून, लग्न करण्यासाठी पळून जाऊ म्हणून दोन वर्षांपासून तिचा पाठलाग करून त्रास दिला जात होता तसेच कुटुंबातील आई, वडिलांनाही त्रास दिला जात हाेता. या त्रासास कंटाळून सदरील मुलीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात कलम ३०५, ३३४ (ड), आयपीसी ७, ८ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी तपास करून आरोपी किरण खंडू जाधव (रा. नणंद, ता. निलंगा) याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. मुलीचा मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांनी दिलेल्या योग्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी काम पाहिले. ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोलीस उपनिरीक्षक आवेज काजी, पोना. इम्रान शेख, पोहेकॉ. तुकाराम चव्हाण यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन केले.