शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

सात हजार जणांनी केला दृष्टिदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

उदगीर : आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे कोणाच्या तरी कामी येतात ही जाणीव ठेवून सात हजार जणांनी ...

उदगीर : आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे कोणाच्या तरी कामी येतात ही जाणीव ठेवून सात हजार जणांनी येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून दृष्टिदानाचा संकल्प केला आहे. नेत्रदानाच्या या यज्ञातून ३६० जणांना हे जग पाहता आले असून, मरावे परी नेत्ररूपे उरावे, या वचनाची सार्थकता सिद्ध झाली आहे.

२६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. भारतात आजही नेत्रपटलाअभावी ५० लाख लोक पाहू शकत नाहीत. नेत्रदानाच्या बाबतीत आजही आपल्या देशात उदासीनता असून, दरवर्षी ९५ लाखांच्या आसपास मृत्यू होत असताना ही केवळ पन्नास हजार जणच नेत्रदान करतात. मृत्यूनंतर आपले डोळे कोणाच्या तरी कामाला येतील या भावनेने होणाऱ्या एकाच्या नेत्रदानामुळे दोघांना दृष्टी मिळते. ही बाब लक्षात घेऊन उदयगिरी लॉयन्स नेत्ररुग्णालयाने जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जाणीव जागृती करीत हजारो जणांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यातून ९०० जणांनी यावर्षी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यापैकी ५०० जणांनी दृष्टिदानाचे संकल्प पत्र भरून दिले आहेत. हा यज्ञ सुरू झाल्यापासून आजपर्यंत ३६० जणांना दृष्टी मिळाल्याने नेत्रदाते शरीराने गेले तरी दृष्टी ने अमर झाले आहेत.

नेत्रदान चळवळीला गती...

कोरोनामुळे अंधत्व निवारण व नेत्रदान चळवळीला अनेक अडचणी आल्या. मात्र याच पंधरवड्यात आम्ही ही चळवळ गतिमान करण्यासाठी जाणीव जागृती केली असून, यशही आले आहे. बहुतांश रुग्णांचे डोळे हे संसर्गामुळे खराब होतात. अशा रुग्णांना नवीन दृष्टी मिळविण्यासाठी बुबुळ (कॉनिआ) महत्त्वाची भूमिका बजावते. मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्यांचे डोळेच काढले जातात, असा गैरसमज आहे. परंतु नेत्रदान करताना संबंधित मृत व्यक्तीचे केवळ कॉनिआ पटल काढले जाते. यामुळे चेहरा जरासाही विद्रूप होत नाही. गरजवंत कुणाही रुग्णांना हे कार्निआ दान करता येते. असे उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया यांनी सांगितले.