शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Updated: December 13, 2023 17:28 IST

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली; अधिग्रहणासाठी १५ गावांचे प्रस्ताव

लातूर : गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. आणखी एका प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के झाल्याने टंचाईची समस्या वाढू लागली आहे.

गत पावसाळ्यात विलंबाने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला होता. पिकांपुरता पाऊस झाल्याने खरिपातील पिके चांगली उगवली होती. परंतु, ऑगस्टमध्ये जवळपास महिनाभरापेक्षा अधिक दिवस पावसाने ताण दिला. परिणामी, खरिपातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. अल्प पावसामुळे जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह रेणा, तिरू या नद्याही वाहिल्या नाहीत. त्याबरोबर नालेही खळाळले नाही. त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.

जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होतो. मात्र, यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत प्रशासनाने ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी ४ कोटी २९ लाखांचा टंचाई निवारण आराखडा केला. दरम्यान, नोव्हेंबर अखेरीसपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

व्हटी, तिरू, तावरजा जोत्याखाली...दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या वाढत आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी रेणापूर तालुक्यातील व्हटी आणि उदगीर तालुक्यातील तिरू या दोन मध्यम प्रकल्पांतील जलसाठा यापूर्वीच जोत्याखाली गेला आहे. आता लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तीन मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठाच नाही.

मध्यम प्रकल्पात २६ दलघमी जलसाठा...जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत एकूण २६.०३७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात रेणापूर मध्यम प्रकल्पात ३.८८२, देवर्जन - ३.४६९, साकोळ- ४.९२०, घरणी- ६.७६७, मसलगा- ६.६९९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणीसाठा...प्रकल्प - टक्केवारीतावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १८.८९तिरू - ००देवर्जन - ३२.४८साकोळ - ४४.९४घरणी - ३०.१२मसलगा - ५१.४७एकूण - २१.३१

तलावात २३.९० टक्के साठा...लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. या तलावात प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा ७५.१०७ दलघमी आहे. त्याची टक्केवारी २३.९९ अशी आहे. दरम्यान, दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत असल्याने प्रशासनाने जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केले आहेत.

१५ गावांत पाणीटंचाईच्या झळा...डिसेंबरमध्येच जिल्ह्यातील १२ गावे आणि तीन वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या गावांनी १८ विहिरी, कूपनलिका अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. पंचायत समितीने पाहणी करून पाच गावांचे प्रस्ताव तहसीलकडे सादर केले आहेत. त्यात लातूर- १, औसा - २, अहमदपूर -१, शिरुर अनंतपाळ तालुक्यात एका गावचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी