शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Updated: December 13, 2023 17:28 IST

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली; अधिग्रहणासाठी १५ गावांचे प्रस्ताव

लातूर : गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. आणखी एका प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के झाल्याने टंचाईची समस्या वाढू लागली आहे.

गत पावसाळ्यात विलंबाने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला होता. पिकांपुरता पाऊस झाल्याने खरिपातील पिके चांगली उगवली होती. परंतु, ऑगस्टमध्ये जवळपास महिनाभरापेक्षा अधिक दिवस पावसाने ताण दिला. परिणामी, खरिपातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. अल्प पावसामुळे जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह रेणा, तिरू या नद्याही वाहिल्या नाहीत. त्याबरोबर नालेही खळाळले नाही. त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.

जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होतो. मात्र, यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत प्रशासनाने ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी ४ कोटी २९ लाखांचा टंचाई निवारण आराखडा केला. दरम्यान, नोव्हेंबर अखेरीसपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

व्हटी, तिरू, तावरजा जोत्याखाली...दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या वाढत आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी रेणापूर तालुक्यातील व्हटी आणि उदगीर तालुक्यातील तिरू या दोन मध्यम प्रकल्पांतील जलसाठा यापूर्वीच जोत्याखाली गेला आहे. आता लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तीन मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठाच नाही.

मध्यम प्रकल्पात २६ दलघमी जलसाठा...जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत एकूण २६.०३७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात रेणापूर मध्यम प्रकल्पात ३.८८२, देवर्जन - ३.४६९, साकोळ- ४.९२०, घरणी- ६.७६७, मसलगा- ६.६९९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणीसाठा...प्रकल्प - टक्केवारीतावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १८.८९तिरू - ००देवर्जन - ३२.४८साकोळ - ४४.९४घरणी - ३०.१२मसलगा - ५१.४७एकूण - २१.३१

तलावात २३.९० टक्के साठा...लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. या तलावात प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा ७५.१०७ दलघमी आहे. त्याची टक्केवारी २३.९९ अशी आहे. दरम्यान, दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत असल्याने प्रशासनाने जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केले आहेत.

१५ गावांत पाणीटंचाईच्या झळा...डिसेंबरमध्येच जिल्ह्यातील १२ गावे आणि तीन वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या गावांनी १८ विहिरी, कूपनलिका अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. पंचायत समितीने पाहणी करून पाच गावांचे प्रस्ताव तहसीलकडे सादर केले आहेत. त्यात लातूर- १, औसा - २, अहमदपूर -१, शिरुर अनंतपाळ तालुक्यात एका गावचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी