शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाळवाडी गाव १० दिवसांसाठी सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST

चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील लिंबाळवाडी येथील सप्ताहाच्या कार्यक्रमातून गावातील ९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभिर्याने ...

चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील लिंबाळवाडी येथील सप्ताहाच्या कार्यक्रमातून गावातील ९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून गावातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याची मोहीम सुरु केली आहे. दरम्यान, गावातील एक व्यक्ती अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी गेला होता. तो गावात परतल्यानंतर त्याच्या संपर्कातून कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तालुक्यातील लिंबाळवाडी हे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात धार्मिक सप्ताह बुधवारपर्यंत पार पडला. त्यात गावातील काही भाविकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, गावातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीनंतर निष्पन्न झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या संपर्कातील ९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्या. त्यामुळे गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांत गावातील २७५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यात ९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनास धक्काच बसला.

त्यामुळे तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अर्चना पंडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हासनाळे, जिल्हा परीषद सदस्य धनश्री अर्जुने, सरपंच शरद बिराजदार, तलाठी अविनाश पवार, ग्रामसेविका अपेक्षा पाटील यांनी लिंबाळवाडी गावात जाऊन शुक्रवारी पाहणी केली तसेच तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन सरपंच शरद बिराजदार यांनी केले आहे.

गावात १० जणांचे पथक...

आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हासनाळे व त्यांचे सहकारी असे एकूण दहा जणांचे एक पथक येथे गावातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करीत आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाणार आहे. काहींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे तर काही रुग्णांना चाकूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अर्चना पंडगे यांनी सांगितले.

गावातील कोणीही बाहेरगावी जणार नाही...

कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून गाव दहा दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. या कालावधीत गावातील कोणीही बाहेरगावी जाणार नाही अथवा गावात येणार नाही. ग्रामस्थांना संसारपयोगी साहित्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरपोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- डाॅ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.