शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लिंबाळवाडी गाव १० दिवसांसाठी सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST

चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील लिंबाळवाडी येथील सप्ताहाच्या कार्यक्रमातून गावातील ९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभिर्याने ...

चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील लिंबाळवाडी येथील सप्ताहाच्या कार्यक्रमातून गावातील ९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून गावातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याची मोहीम सुरु केली आहे. दरम्यान, गावातील एक व्यक्ती अंत्यसंस्कारासाठी बाहेरगावी गेला होता. तो गावात परतल्यानंतर त्याच्या संपर्कातून कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तालुक्यातील लिंबाळवाडी हे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात धार्मिक सप्ताह बुधवारपर्यंत पार पडला. त्यात गावातील काही भाविकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, गावातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीनंतर निष्पन्न झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या संपर्कातील ९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्या. त्यामुळे गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांत गावातील २७५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यात ९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनास धक्काच बसला.

त्यामुळे तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अर्चना पंडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हासनाळे, जिल्हा परीषद सदस्य धनश्री अर्जुने, सरपंच शरद बिराजदार, तलाठी अविनाश पवार, ग्रामसेविका अपेक्षा पाटील यांनी लिंबाळवाडी गावात जाऊन शुक्रवारी पाहणी केली तसेच तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन सरपंच शरद बिराजदार यांनी केले आहे.

गावात १० जणांचे पथक...

आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हासनाळे व त्यांचे सहकारी असे एकूण दहा जणांचे एक पथक येथे गावातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करीत आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाणार आहे. काहींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे तर काही रुग्णांना चाकूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अर्चना पंडगे यांनी सांगितले.

गावातील कोणीही बाहेरगावी जणार नाही...

कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून गाव दहा दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. या कालावधीत गावातील कोणीही बाहेरगावी जाणार नाही अथवा गावात येणार नाही. ग्रामस्थांना संसारपयोगी साहित्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरपोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- डाॅ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.