शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: January 12, 2025 20:03 IST

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते.

राजकुमार जाेंधळे / उजनी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील कमालपूर शिवारात एका शाळकरी मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी समाेर आली. याप्रकरणी दाेघा मित्रांवर संशय असून, एकाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रितेश रवींद्र गिरी (वय १४) असे मयत मुलाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते. दरम्यान, रितेश रवींद्र गिरी हाही या मुलासाेबत गेला हाेता. रात्र झाली तरी रितेश हा घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी रात्रभर शाेध घेतला असता, ताे आढळून आला नाही. अखेर कुटुंबीयांनी साेबत असलेल्या मित्रांपैकी एकाला दरडावून विचारणा केली असता त्याने घटनेची माहिती देताना सांगितले की, रितेश गिरी याला आम्हीच जिवे मारून त्याचा मृतदेह साेयाबीनच्या ढिगाऱ्याखाली पुरला आहे. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी विजया गिरी यांच्या शेतातील साेयाबीनच्या ढिगाऱ्याकडे धाव घेतली. भादा पाेलिसांनाही माहिती देण्यात आली. पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. साेयाबीनचा ढिगारा बाजूला केल्यानंतर रितेश गिरी या शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.

पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, उजनी आराेग्य केंद्रात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी आक्राेश करीत गुन्ह्यातील आराेपींना अटक करावी, या मागणीसाठी आराेग्य केंद्रातच ठिय्या मांडला. शिवाय, भादा पाेलिस ठाण्याचे सपाेनि. राहुलकुमार भाेळ यांना घेरावही घातला.

कमालपूर, उजनीमध्ये बंदाेबस्त...

घटनेचे गांभीर्य ओळखून कमालपूर आणि उजनी आराेग्य केंद्रात राज्य राखीव दलाच्या तुकड्या, भादा ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय, औसा डीवायएसपी कुमार चाैधरी यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली.

तपासानंतरच कारणांचा उलगडा...

कमालपूर येथील १४ वर्षीय शाळकरी मुलाचा खून करण्यात आला असून, यातील संशयित मित्रांपैकी एकाला पाेलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. खून नेमक्या काेणत्या कारणासाठी करण्यात आला याचा पाेलिस शाेध घेत आहेत. तपासानंतरच कारणांचा उलगडा हाेणार आहे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर