शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: January 12, 2025 20:03 IST

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते.

राजकुमार जाेंधळे / उजनी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील कमालपूर शिवारात एका शाळकरी मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी समाेर आली. याप्रकरणी दाेघा मित्रांवर संशय असून, एकाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रितेश रवींद्र गिरी (वय १४) असे मयत मुलाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते. दरम्यान, रितेश रवींद्र गिरी हाही या मुलासाेबत गेला हाेता. रात्र झाली तरी रितेश हा घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी रात्रभर शाेध घेतला असता, ताे आढळून आला नाही. अखेर कुटुंबीयांनी साेबत असलेल्या मित्रांपैकी एकाला दरडावून विचारणा केली असता त्याने घटनेची माहिती देताना सांगितले की, रितेश गिरी याला आम्हीच जिवे मारून त्याचा मृतदेह साेयाबीनच्या ढिगाऱ्याखाली पुरला आहे. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी विजया गिरी यांच्या शेतातील साेयाबीनच्या ढिगाऱ्याकडे धाव घेतली. भादा पाेलिसांनाही माहिती देण्यात आली. पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. साेयाबीनचा ढिगारा बाजूला केल्यानंतर रितेश गिरी या शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.

पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, उजनी आराेग्य केंद्रात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी आक्राेश करीत गुन्ह्यातील आराेपींना अटक करावी, या मागणीसाठी आराेग्य केंद्रातच ठिय्या मांडला. शिवाय, भादा पाेलिस ठाण्याचे सपाेनि. राहुलकुमार भाेळ यांना घेरावही घातला.

कमालपूर, उजनीमध्ये बंदाेबस्त...

घटनेचे गांभीर्य ओळखून कमालपूर आणि उजनी आराेग्य केंद्रात राज्य राखीव दलाच्या तुकड्या, भादा ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय, औसा डीवायएसपी कुमार चाैधरी यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली.

तपासानंतरच कारणांचा उलगडा...

कमालपूर येथील १४ वर्षीय शाळकरी मुलाचा खून करण्यात आला असून, यातील संशयित मित्रांपैकी एकाला पाेलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. खून नेमक्या काेणत्या कारणासाठी करण्यात आला याचा पाेलिस शाेध घेत आहेत. तपासानंतरच कारणांचा उलगडा हाेणार आहे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर