शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मोबाईल चोरीच्या संशयातून शाळकरी मुलाचा खून

By हरी मोकाशे | Updated: January 14, 2024 17:40 IST

पोलिस तपासात उलगडले हत्येचे कारण.

उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील कुमठा (खु.) येथील एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली होती. मयत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयातून खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले, तालुक्यातील कुमठा (खु.) येथील १४ वर्षीय मुलाचा शनिवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यावरुन ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांत खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाचा उकल करण्यासाठी त्याच गावात एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करणारा किरण ज्ञानोबा देवनाळे (२८, रा. पिंपरी, ता. उदगीर) यास रात्री ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली रात्री उशिरा दिली. आरोपीचा मोबाईल मयत मुलगा संतोष गोविंद घुगे याने चोरल्याचा संशय आल्यावरून बुधवारी रात्रीच्या सुमारास फावड्याच्या दांड्याने डोक्यात वार केला. तसेच दगडाने चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. तसेच सोबतच्या ब्लेड व कटरने त्याचे केस कापून चेहरा विद्रुप करून मृतदेह शेतानजिकच्या नालीत नेऊन टाकला.

या खुनात वापरलेला फावड्याच्या दांडा, ब्लेड, कटर, मयत मुलाचा मोबाईल, घड्याळ, आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे आरोपीकडून पोलिसांनी जप्त केले. आरोपीस रविवारी उदगीर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. खुनाचा उकल करण्यासाठी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुमित बनसोडे, रवींद्र तारू, तानाजी चेरले, पोहेकॉ. व्यंकट शिरसे, राजीव घोरपडे यांनी प्रयत्न केले. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत.

टॅग्स :laturलातूर