शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लातुरात टंचाईच्या झळा; २७ गावांच्या अधिग्रहण प्रस्तावावर निर्णय होईना!

By संदीप शिंदे | Updated: April 19, 2023 18:07 IST

या गावांनी पंचायत समितीकडे विहीर,विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा,अशी मागणी केली आहे.

लातूर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या चटक्यासोबतच प्रकल्प, विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालवत चालली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २७ गाव-वाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा, यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, त्यावर अद्याप पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाकडून कोणताच निर्णय झालेला नाही. परिणामी, २७ गावांतील नागरिकांना प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यात २२ गावे आणि ५ वाड्या असे एकूण २७ गावांनी ३० प्रस्ताव संबधित पंचायत समितीकडे सादर केले आहेत. यामध्ये लातूर तालुक्यातील १, औसा २, निलंगा ३, अहमदपूर १६, उदगीर २ तर जळकोट तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे. या गावांनी पंचायत समितीकडे विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाकडे १४ गावांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. हे प्रस्ताव तहसील कार्यालयाच्या मान्यतेनंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातील. त्यांच्याकडून प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहिले होते. परिणामी, पाणीपातळीत वाढ झाली. मात्र, आता उन्हाचा पारा वाढत असल्याने जलस्रोतांची पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव दाखल केल्यावर तहसील आणि नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातात. त्यामुळे या प्रस्तावांना वेळ लागत असून, यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावरच अधिकार देण्याची मागणी होत आहे.

जुलै ते ऑगस्टसाठी सव्वा चार कोटींचा आराखडा...जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत पाणी टंचाई निवारणासाठी चार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी सांगितले आहे. परिणामी, नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून प्रशासनाकडून सव्वा चार कोटींचा विशेष टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास मान्यताही देण्यात आली आहे.

अधिग्रहणासोबतच टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा...टंचाई निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, विहिरीचे खोलीकरण करणे, बुडक्या घेणे, विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, प्रगती पथावरील नळ योजना पूर्ण करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपर्यंत २७ गावांचे प्रस्ताव आले असून, मे महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यास या प्रस्तावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी