शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

लातुरात टंचाईच्या झळा; २७ गावांच्या अधिग्रहण प्रस्तावावर निर्णय होईना!

By संदीप शिंदे | Updated: April 19, 2023 18:07 IST

या गावांनी पंचायत समितीकडे विहीर,विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा,अशी मागणी केली आहे.

लातूर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या चटक्यासोबतच प्रकल्प, विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालवत चालली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २७ गाव-वाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा, यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, त्यावर अद्याप पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाकडून कोणताच निर्णय झालेला नाही. परिणामी, २७ गावांतील नागरिकांना प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यात २२ गावे आणि ५ वाड्या असे एकूण २७ गावांनी ३० प्रस्ताव संबधित पंचायत समितीकडे सादर केले आहेत. यामध्ये लातूर तालुक्यातील १, औसा २, निलंगा ३, अहमदपूर १६, उदगीर २ तर जळकोट तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे. या गावांनी पंचायत समितीकडे विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाकडे १४ गावांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. हे प्रस्ताव तहसील कार्यालयाच्या मान्यतेनंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातील. त्यांच्याकडून प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहिले होते. परिणामी, पाणीपातळीत वाढ झाली. मात्र, आता उन्हाचा पारा वाढत असल्याने जलस्रोतांची पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव दाखल केल्यावर तहसील आणि नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातात. त्यामुळे या प्रस्तावांना वेळ लागत असून, यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावरच अधिकार देण्याची मागणी होत आहे.

जुलै ते ऑगस्टसाठी सव्वा चार कोटींचा आराखडा...जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत पाणी टंचाई निवारणासाठी चार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी सांगितले आहे. परिणामी, नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून प्रशासनाकडून सव्वा चार कोटींचा विशेष टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास मान्यताही देण्यात आली आहे.

अधिग्रहणासोबतच टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा...टंचाई निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, विहिरीचे खोलीकरण करणे, बुडक्या घेणे, विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, प्रगती पथावरील नळ योजना पूर्ण करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपर्यंत २७ गावांचे प्रस्ताव आले असून, मे महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यास या प्रस्तावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी