शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

लातुरात टंचाईच्या झळा; २७ गावांच्या अधिग्रहण प्रस्तावावर निर्णय होईना!

By संदीप शिंदे | Updated: April 19, 2023 18:07 IST

या गावांनी पंचायत समितीकडे विहीर,विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा,अशी मागणी केली आहे.

लातूर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या चटक्यासोबतच प्रकल्प, विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालवत चालली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २७ गाव-वाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा, यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, त्यावर अद्याप पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाकडून कोणताच निर्णय झालेला नाही. परिणामी, २७ गावांतील नागरिकांना प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यात २२ गावे आणि ५ वाड्या असे एकूण २७ गावांनी ३० प्रस्ताव संबधित पंचायत समितीकडे सादर केले आहेत. यामध्ये लातूर तालुक्यातील १, औसा २, निलंगा ३, अहमदपूर १६, उदगीर २ तर जळकोट तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे. या गावांनी पंचायत समितीकडे विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाकडे १४ गावांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. हे प्रस्ताव तहसील कार्यालयाच्या मान्यतेनंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातील. त्यांच्याकडून प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहिले होते. परिणामी, पाणीपातळीत वाढ झाली. मात्र, आता उन्हाचा पारा वाढत असल्याने जलस्रोतांची पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव दाखल केल्यावर तहसील आणि नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे जातात. त्यामुळे या प्रस्तावांना वेळ लागत असून, यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावरच अधिकार देण्याची मागणी होत आहे.

जुलै ते ऑगस्टसाठी सव्वा चार कोटींचा आराखडा...जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत पाणी टंचाई निवारणासाठी चार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी सांगितले आहे. परिणामी, नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून प्रशासनाकडून सव्वा चार कोटींचा विशेष टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास मान्यताही देण्यात आली आहे.

अधिग्रहणासोबतच टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा...टंचाई निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, विहिरीचे खोलीकरण करणे, बुडक्या घेणे, विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, प्रगती पथावरील नळ योजना पूर्ण करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपर्यंत २७ गावांचे प्रस्ताव आले असून, मे महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यास या प्रस्तावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी