शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वीकेंड लॉकडाऊनमुळे शहरात सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ हजारांच्या पुढे आहे. चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्येत ...

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ हजारांच्या पुढे आहे. चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद दिला. लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत शुकशुकाट होता. रस्त्यावर केवळ पोलीस दिसत होते. शिवाजी चौक, गंजगोलाई, गांधी चौक, गूळ मार्केट, औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोडवर नेहमी वर्दळ असते. मात्र, शनिवारी लॉकडाऊन असल्याने चिटपाखरूही रस्त्यावर नव्हते. सगळे शहर सामसूम होते. लातूर शहराप्रमाणे ग्रामीण भागात, तालुक्याच्या ठिकाणीही कडकडीत बंद पाहायला मिळाला. जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या वतीने लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा सतर्क होती. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांना अडवून प्रतिबंधात्मक कारवाई केली. गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी पोलीस ठाण्यात या नागरिकांना बसवून प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने कडेकोट बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.

एसटीचे १८ लाखांचे उत्पन्न बुडाले...

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा, निलंगा या पाचही आगारांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या बंद होत्या. या पाचही आगारांच्या ३०० बस प्रवाशाच्या दिमतीला असायच्या; परंतु प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या बंद होत्या. ६०० फेऱ्यांपैकी जिल्हाअंतर्गत प्रती आगार ८ ते १० फेऱ्या झाल्या. त्यामुळे एस.टी.चे १८ लाखांचे नुकसान पहिल्या दिवशी शनिवारी झाले.

लॉकडाऊनपूर्वी एस.टी.ला. जिल्ह्यातील पाचही आगारांना मिळून दिवसाला ३५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १८ लाखांवर उत्पन्न आले होते. मात्र, त्यातही कडक निर्बंध सुरू झाल्याने घट झाली होती. शनिवारी त्यात पुन्हा आणखी घट झाली असून, प्रवासी नसल्यामुळे एस.टी.ला. १८ लाखांचा तोटा शनिवारी सहन करावा लागला.

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी, ग्रामीण आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना अडवून पोलीस ठाण्यामध्ये आणले. नागरिकांना पोलीस ठाण्यामध्ये काही काळ बसवून त्यांच्याकडून दंड वसूल केला. जवळपास १७ हजार रुपयांचा दंड आकारून सोडून देण्यात आले.