शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

साडेचार कोटी युवकांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण - संभाजी पाटील निलंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 02:05 IST

कौशल्य विकासात महाराष्ट्र अग्रेसर

लातूर : कौशल्यातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असून प्रत्येक वर्षी तीन लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सन २०२२ पर्यंत साडेचार कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आहे. दरम्यान, गेल्या साडेचार वर्षांत कौशल्य विकासात देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रविवारी दिली.

‘लोकमत’शी बोलताना कौशल्य विकास मंत्री निलंगेकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच राज्य नावीन्यता परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना तसेच उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षांत कौशल्य विकासामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला. रोजगार व स्वयंरोजगार तसेच कौशल्य विकासासंबंधी विविध सेवा देण्यासाठी महाकौशल्य पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

कुशल महाराष्ट्र-रोजगारयुक्त महाराष्ट्र या ध्येयपूर्तीसाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात आले आहे. या योजनेनुसार २०१५ ते २०१६ तसेच २०१८ ते २०१९ या कालावधीत १ लाख ७३ हजार ४६९ प्रशिक्षणार्र्थींना प्रशिक्षण दिले आहे. तसेच १ लाख ६९ हजार ६५८ प्रशिक्षणार्र्थींचे मूल्यमापन झाले आहे. त्यानुसार ६५ हजार २७४ जणांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाले आहेत.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत १५ ते ४५ वयोगटातील शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक, दिव्यांग त्याचप्रमाणे महिला प्रवर्गातील उमेदवारांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले गेले. ज्यामध्ये २ लाख २० हजार १४७ प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यात १ लाख ४६ हजार ९६१ जणांचे मूल्यमापन झाले. त्यामधून ५२ हजार ११० रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाले आहेत.

कौशल्य विकास कार्यक्रमांना पंतप्रधानांनी दिली दिशा४कौशल्य विकास कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिशा दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असला पाहिजे, ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. त्यानुसार कौशल्य विकास खात्याने प्रशिक्षण, मूल्यमापन आणि प्रत्यक्ष रोजगार मिळवून देण्यात आघाडी घेतली, अशी माहिती मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.