शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आरटीई प्रवेश प्रक्रिया; लातूर जिल्ह्यात २०० शाळांमध्ये १६६९ जागा, अर्जासाठी १७ मार्चची डेडलाईन

By संदीप शिंदे | Updated: March 1, 2023 18:04 IST

आरटीईची प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होत असते. यंदा या प्रक्रियेस उशिर झाला

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यासाठी जिल्ह्यातील २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नाेंदणी केली असून, १ हजार ६६९ जागांवर मोफत प्रवेश होणार आहेत. दरम्यान, ऑनलाईन अर्ज करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली असून, १७ मार्च अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

आरटीईची प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होत असते. यंदा या प्रक्रियेस उशिर झाला असून, सुरुवातीला शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारपासून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली. १७ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार असून, त्यानंतर राज्यस्तरावर सोडत काढली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविण्यात येणार असून, कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

शिक्षण विभागाकडे २०० शाळांची नोंदणी...आरटीईसाठी २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. यामध्ये अहमदपूर १४, औसा १७, चाकूर ११, देवणी ०८, जळकोट ०४, लातूर ८७, निलंगा २४, रेणापूर ०७, शिरुर अनंतपाळ ०२ तर उदगीर तालुक्यातील २६ शाळांचा समावेश आहे. दरम्यान, या शाळांमध्ये एकूण १६६९ जागा असून, नवीन शैक्षणिक वर्षापर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक...बालकाचा जन्मदाखला, आधार कार्ड, सामाजिक आरक्षणाचा दाखला, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, बालकाचा फोटो, रहिवासी पुरावा, गॅस कार्ड, बँकेचे पासबुक, घरभाडे करार आदी कागदपत्रे लागतात. अर्ज भरण्यास बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सुरुवात झाली असून, मुलांचे अर्ज भरण्यासाठी पालकांनी संगणक केंद्रांवर गर्दी केली होती.

पंचायत समितीत कागदपत्रांची पडताळणी...आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यस्तरावर सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती येथे कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतरच शाळेत प्रवेश निश्चित होईल. दहा तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाlaturलातूर