शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घरकुल, अग्रीम विम्यासाठी औशात महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: July 6, 2024 19:28 IST

३९ गावे घरकुलापासून वंचित : अग्रीम विमा देण्याची मागणी

औसा : २५ टक्के अग्रीमसाठी तालुक्यातील आठही महसूल मंडळे पात्र असतानाही ज्या महसूल मंडळात जास्त नुकसान त्या किल्लारी व मातोळा मंडळांना वगळण्यात आले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ४७ हजार शेतकऱ्यांवर अन्याय झाला. यासह आचारसंहितेच्या काळात जवळच्या गावांना लाभ देऊन ३९ गावांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दीड तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी शहरातील १९ कोटींची घरकुल योजना योग्य वेळी पाठपुरावा न केल्याने रद्द झाली आहे. तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक व कृत्रिम आपत्तीमुळे हैराण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, संजय गांधी निराधार योजनेतील वंचित लाभार्थींना लाभ द्यावा, औसा टी पाॅईंटवर उड्डाणपूल करावा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थींना लाभ देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

या आंदोलनात श्रीशैल्य उटगे, माजी आ. दिनकर माने, संजय शेटे, रशीद शेख, अमर खानापुरे, मौलाना कलिमुल्लाह कादरी, शाम भोसले, श्रीपतराव काकडे, भरत सूर्यवंशी, नारायण लोखंडे, जयश्री उटगे, सई गोरे, उदयसिंह देशमुख, अझहर हाश्मी, पप्पू कुलकर्णी, बजरंग जाधव, संजय उजळंबे, सुभाष पवार, ॲड. मंजूषा हजारे, खुंदमीर मुल्ला, अनिस जहागीरदार, बालाजी सांळुके आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी