शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाढत्या तापमानाचा तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांच्या जीविवास धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 21:37 IST

आर्द्रता वाढली : अकरा दिवसांत ११ जणांचा मृत्यू

बालाजी थेटे/औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ- उतार होत आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. दरम्यान, ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस झाल्याने हवेत आर्द्रता वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे शरीरातील तापमान सहन करण्याची शक्ती कोलमडत आहे. परिणामी, १ ते ११ एप्रिल या कालावधीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

मार्चपासून ऊन वाढले आहे. शेवटच्या आठवड्यात ४० अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान पोहोचले होते. २८ मार्च रोजी ४१ अंश सेल्सिअस, अशी येथील हवामान केंद्रावर नोंद झाली. १ ते ३ एप्रिल या कालावधीत ४१ ते ४३ अंश सेल्सिअस असे कमाल तापमान राहिले. त्यानंतर ४, ५, ६ एप्रिल रोजी कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दरम्यान, मंगळवारपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. हलका पाऊस झाल्याने आर्द्रता वाढली. १० एप्रिल रोजी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. एकंदरीत, औराद परिसरात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची आतापर्यंतची पहिलीच नोंद आहे.

तापमानातील बदलाचा आरोग्यावर परिणामकमाल तापमानात झपाट्याने बदल होत आहे. परिणामी, १ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत परिसरातील ११ ज्येष्ठ नागरिक दगावले आहेत. त्यात विठ्ठल लक्ष्मण शिंगे (९०, रा. माने जवळगा), सोपान यादव गाडे (९२), शेषाबाई शिवराज ऐनापुरे (६०), त्र्यंबकप्पा खंडाळे (७५), कल्याणी महादाप्पा पंचाक्षरी (१०१), रत्नाबाई शंकर गायकवाड (९०), सुभद्राबाई निवृत्ती गायकवाड (७५) (सर्व जण रा. औराद शहाजानी), गंगाबाई मोहनराव मुळजे (७५), शिवाजी दिगंबर डावरगावे (५२), काशीनाथ संतराम बिरादार (७२), रुक्मिणबाई गोविंद शिंगे (८५) (रा. तगरखेडा) यांचा समावेश आहे.

४३ अंश सेल्सिअसपर्यंत सहनशक्तीशरीराची तापमान सहनशीलता ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यापेक्षा अधिक तापमान झाल्यास ते शरीरास सहन होत नाही. तेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत जाते आणि अशक्त व्यक्तींना अधिक त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी सातत्याने पाणी प्यावे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान शेतकऱ्यांनी कामे करू नयेत. सावलीचा आधार घ्यावा. डोक्यास पांढरा गमजा वापरावा. -डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी

तापमान वाढल्याने शरीरातील पाणी कमी...तापमान अचानकपणे कमी- जास्त झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊन मृत्यूही ओढवू शकतो.-डॉ. सुनील पोतदार, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलlaturलातूर