शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

खाद्यतेलाच्या दरात वाढ, सामान्य कुटुंब झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST

ही आहेत दरवाढीचे कारणे... राज्यात बदललेल्या वातावरणामुळे तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सागरी ...

ही आहेत दरवाढीचे कारणे...

राज्यात बदललेल्या वातावरणामुळे तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सागरी मार्गाने भारतात येणारे तेलाचे कंटेनर उपलब्ध होत नसल्याची अडचण आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. तेल डबा घेणारे ग्राहक सुटे तेल नेत आहेत. बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम तेलबियांच्या उत्पादनावर झाला आहे. यामुळे खाद्यतेलाचा दर वाढला असल्याचे अहमदपूरातील किराणा व्यावसायिक गंगाराम पळसकर, राजकुमार तत्तापूरे यांनी सांगितले.

बाजारातील खाद्यतेलाचे दर...

आता एक किलो पिशवीचा दर १४० रुपये आहे. आधी हा दर ८० ते ८५ रुपये होता. तर काही कंपन्यांच्या एक किलो तेलाच्या पिशवीचा दर १६० रुपयांवर गेला आहे. आधी १२५ रुपये दर होता. तर १५ किलो तेलाच्या डब्याचा दर १८०० रुपये आहे. तो आधी १३०० रुपये होता. तर काही कंपन्यांच्या डब्याचा दर १८५० रुपयांवर गेला आहे. आधी तो दर १४५० रुपये होता. खाद्यतेल दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत असून, परिणामी, गोरगरिबांच्या अडचणीत वाढत हाेत आहे, दरवाढ कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी लांजी येथील गृहिणी शिलींदरबाई मुंडे यांनी केली आहे.