शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

रिमझिम पावसाने खरीप पिकांना मिळले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST

लातूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडाे हेक्टरवरील साेयाबीनसह खरिपातील इतर पिके धाेक्यात आली हाेती. मात्र, गत ...

लातूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडाे हेक्टरवरील साेयाबीनसह खरिपातील इतर पिके धाेक्यात आली हाेती. मात्र, गत चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या रिमझिम पावसाने या पिकांना आता जीवदान मिळाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मृगाच्या नक्षत्रावर दमदार पावसाने हजेरी लावली. याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली. कालांतराने पावसाने दडी मारली, त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. जवळपास दाेन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने दडी मारली हाेती. आता पुन्हा रिमझिम पावसाने लातूर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. यातून शेकडाे हेक्टरवरील खरिपांच्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. उदगीर, चाकूर आणि जळकाेट तालुक्यांतील वाढवणा बु., किनी यल्लादेवी, मन्ना उमरगा, एकुर्का राेड, सुकणी, इस्मालपूर, कल्लूर, खेर्डा, डाेंगरशेळकी, बेळसांगवी, डांगेवाडी, हाळी-हंडरगुळी, सुकणी, आडाेळवाडी, डाेंग्रज, वडगाव एक्की, माेर्तळवाडी, चिमाचीवाडी, डाऊळ, हिप्परगा, गुडसूर परिसरातील शेतकऱ्यांना सध्याला दिलासा मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर साेयाबीनचा पेरा घेतला जाताे. जवळपास साेयाबीनचे क्षेत्र ७० टक्क्यांवर आहे. त्यापाठाेपाठ खरिपातील इतर पिकेही घेतली जातात. दरम्यान, साेयाबीनचे पीक जाेमात हाेते. मात्र, गत दाेन आठवड्यांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. मध्यंतरी कडक उन्हामुळे साेयाबीनचे पीक आता सुकू लागले हाेते. यंदाच्या हंगामात लागवड खर्चही निघेल की नाही, याबाबत शाश्वती देता येणार नाही. आता शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने वाढ खुंटली आहे. यातून उत्पादनात माेठ्या प्रमाणावर घट हाेणार असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदाचा हंगाम धाेक्यात...

उदगीर, जळकाेट आणि चाकूर तालुक्यांतील काही भाग डाेंगराळ आहे तर काही भागातील जमिनी चांगल्या प्रतीच्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडून साेयाबीन आणि इतर पिकांचा पेरा घेतला जाताे. काही शेतकऱ्यांना पाझर तलावाचे पाणी आहे. त्यामुळे त्यांनी उसाची लागवड केली आहे. यातून हाती चार पैसे खेळू लागतात. बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी काेरडवाहू आहेत. माळरानावर एकच हंगाम घेता येताे. अशास्थितीत यंदाही खरिपातील पिकांची वाढ खुंटली आहे. यातून शेतकऱ्यांच्या पदरी लागवड खर्चही पडेल की नाही, हे सांगणे आता कठीण झाले आहे.