शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लातूर मंडळात पुरवणी परीक्षेत दहावीचा ५१ तर बारावीचा ५८ टक्के निकाल

By संदीप शिंदे | Updated: August 28, 2023 15:32 IST

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश मिळणार

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये लातूर विभागीय मंडळाचा दहावीचा ५१.४७ टक्के तर बारावीचा ५८.५५ टक्के निकाल लागला आहे.

शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल जुनमध्ये जाहीर करण्यात आला. यामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. यात दहावीसाठी लातूर विभागीय मंडळातून ३१४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी २९५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर १५२० विद्यार्थ उत्तीर्ण झाले असून, ५१.४७ टक्के निकाल लागला आहे. बारावीसाठी ४ हजार २८६ विद्यार्थी नोंदणीकृत होते. यापैकी ४ हजार १४८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते. तर २४२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ५८.५५ टक्के लागला असल्याचे लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष तथा सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी...दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार या परीक्षेत दहावीचे १५२० तर बारावीचे २४२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता त्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे. दरम्यान, पुरवणी परीक्षेत दहावीचे १४३३ तर बारावीचे १७१९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, त्यांना आता मार्चमध्ये पुन्हा परीक्षा देता येणार आहे.

टॅग्स :ssc examदहावीlaturलातूरexamपरीक्षा