शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

दफनविधीसाठीच्या रस्त्याचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST

चाकूर तालुक्यातील जानवळ हे जवळपास १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीसाठी रस्ता नसल्याने दफनविधीसाठी मोठी समस्या ...

चाकूर तालुक्यातील जानवळ हे जवळपास १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीसाठी रस्ता नसल्याने दफनविधीसाठी मोठी समस्या निर्माण होत असे. पावसाळ्यात तर विविध अडचणी निर्माण होत असत. त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांकडून रस्त्याचा प्रश्न सोडविण्याची सतत मागणी होत होती. त्यामुळे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता जाणार आहे, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

यावेळी शेतकरी श्रीधर साखरे, वैजनाथ साखरे, ज्ञानोबा पवार, पांडुरंग साखरे आदी उपस्थित होते. त्यांनी रस्त्यासाठी ६ फूट रुंद व १८० मीटर लांब जागा देण्यास सहमती दर्शविली.

शुक्रवारी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, मंडळाधिकारी नीळकंठ केंद्रे, तलाठी भाऊसाहेब पाटील, भूमी अभिलेखचे कर्मचारी अविनाश गायकवाड, गुरुमे, वाय.एम. कर्डिले, बीट जमादार थोरमोटे, उपसरपंच ज्ञानेश्वर पवार, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष मधुकर कर्डिले, आत्माराम गव्हाणे, सत्तार शेख, अयुब पठाण, बशीरसाहेब करपुडे आदींच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी सहकार्य करावे...

जानवळ येथील दफनभूमीच्या रस्त्याचा प्रश्न ५० वर्षांपासून प्रलंबित होता. संबंधित शेतकरी व मुस्लिम बांधवांच्या सहकार्यातून तो निकाली काढण्यात आला आहे. जानवळ व परिसरातील शेत रस्त्याचे प्रश्न शेतकऱ्यांच्या सहकार्यातून निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी केले.