शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

रेणापूर तालुक्याला २६ हजार क्विंटल बियाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST

रेणापूर : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. यंदाच्या हंगामात ...

रेणापूर : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. यंदाच्या हंगामात रेणापूर तालुक्यात जवळपास ४३ हजार हेक्टरवर पेरा अपेक्षित असून, त्यासाठी २६ हजार ६४० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे.

रेणापूर तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र ४६ हजार ३२ हेक्टर असून, त्यापैकी यंदा ४३ हजार २७५ हेक्टरवर पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यात सर्वधिक पेरा सोयाबीनचा होणार असून, ४० हजार ५०० हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. ज्वारी ७००, भात १०, बाजरी २०, मका ४५०, तूर १ हजार २५०, उडीद ५०, तीळ ५०, भुईमुगाची १० हेक्‍टरवर पेरणी होईल. कापसाची ७५ हेक्टरवर लागवड होईल.

तालुक्याला सोयाबीन बियाणे २६ हजार ३२५ क्विंटल, ज्वारी ५३, भात ६, बाजरी १, मका ६८, तूर १५०, मूग १८, उडीद ६, तीळ १, भुईमुगाच्या १० क्विंटल बियाण्याची तर २ क्विंटल कापूस बियाण्याची आवश्यकता आहे. एकूण २६ हजार ६४० क्विंटल बियाण्याची गरज आहे.

दरम्यान, ‘महाबीज’कडे सोयाबीन, तूर, बाजरी, मका, मूग, उडीद आणि कापसासाठी ५ हजार ४०८ क्विंटल, खासगी कंपन्यांकडे ४ हजार ८२ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांकडे १७ हजार २७६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

बियाण्याची अडचण नाही...

तालुक्यात यंदा जवळपास ४३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाचा पेरा होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी लागणारे बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याचा वापर करावा. त्यासाठी उगवण क्षमता तपासावी आणि बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे यांनी केले आहे.