शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काळ्या पैशाबाबत श्वेतपत्रिका काढा; काँग्रेसच्या मोर्चात मागणी

By admin | Updated: January 6, 2017 21:17 IST

नोटाबंदीनंतर देशात किती काळा पैसा जमा झाला, याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहारा व बिर्ला ग्रुप यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होत आहे

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 6 -  नोटाबंदीनंतर देशात किती काळा पैसा जमा झाला, याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहारा व बिर्ला ग्रुप यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होत आहेत, याची नि:पक्ष चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शहर जिल्हा काँगे्रसच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  नोटाबंदीनंतर देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यावर पंतप्रधानांचे मौन आहे. सर्वसामान्य जनतेवर नोटबंदीचा परिणाम झाला असताना उपाययोजना आखल्या जात नाहीत. त्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून  निघालेला मोर्चा दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन  देण्यात आले.
  या आहेत मागण्या 
 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला आहे, याची नि:पक्ष चौकशी करण्यात यावी.
 - नोटाबंदी नंतर जिल्ह्यात काळा पैसा उघडकीस आला आहे का? असल्यास कोणाचा किती पैसा आहे, ते जाहीर करण्यात यावे.
 - जिल्ह्यात किती एटीएम आहेत? त्यातील किती एटीएम २४ तास सुरू आहेत?
 -जिल्ह्यातील एटीएम व बँकेसमोरच्या रांगा संपल्या आहेत का? रांगा संपल्या नसतील तर जबाबदारी कोणाची आहे.
 - नोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने पूर्ण होत असताना आजूनही बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा कायम का आहेत? आदी प्रश्नांची उत्तरे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सरकाराला काँग्रेसने विचारली आहेत.