शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

खत, बियाणांच्या किमती कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST

कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना केंद्र सरकारने खत, बियाणांच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले ...

कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना केंद्र सरकारने खत, बियाणांच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले आहे. अगोदरच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चाऐवढा भाव मिळत नाही. परिणामी, शेतकरी शेतीसाठी बँक, सोसायटीकडून काढलेल्या पीककर्जाची आर्थिक परिस्थितीमुळे परतफेड करू शकत नाही. त्यातच केंद्रे शासनाने खत, बी-बियाणांत दर वाढ केली आहे.

केंद्रीय खत, रसायन मंत्र्यांनी बैठकीत खत व बी- बियाणांच्या किमतीत दरवाढ होणार नाही, असा निर्णय घेतला होता. तरीसुद्धा दर वाढ झाली. ही दरवाढ तत्काळ रद्द करून जुन्या किमतीमध्ये खत, बियाणे विक्री करण्यात यावे. तसेच बियाणे, खतात फसवणूक व लुबाडणूक केलेल्या कंपनांच्या बियाणे विक्रीस बंदी घालावी. दुकानदारांकडे आलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या खत व बियाणांची योग्यता कृषी खात्यामार्फत तपासली जावी. चांगले खते व बियाणे विक्रीस परवानगी देण्यात यावी. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही. प्रत्येक खत दुकानांसमोर केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या किमतीचे दर फलक लावण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

निवेदनावर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर, दयानंद चोपणे, सुरेंद्र धुमाळ, लाला पटेल, अशोकआप्पा शेटकार, सिराज देशमुख, देविदास जाधव, अमित नितनवरे, सोनाजी कदम, भरत बियाणी, रमेश मोगरगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.