शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूर तालूक्यातील ३२ हजार कुटुंबांना रेशनच्या धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : संचारबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे रेशनकार्डधारकांना मे महिन्यात मोफत रेशन वाटपाचा निर्णय शासनाच्यावतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदपूर : संचारबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे रेशनकार्डधारकांना मे महिन्यात मोफत रेशन वाटपाचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे अहमदपूर तालुक्यातील ३२ हजार २३५ शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनचे वाटप होणार आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटप होणार असल्याने अनेक गरजूंना आधार मिळणार आहे.

संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती निर्माण झाली आहे. अगोदरच कामधंदे बंद झाल्यामुळे मजुरांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यामुळे मजुरांच्या संकटामध्ये भर पडली आहे. मजुरांसाठी शासनाने मदतीच्या हात दिला असून, गोरगरीब, हातावर पोट असलेल्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत मोफत गहू, तांदूळ उपलब्ध करुन दिले आहेत. अहमदपूर तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत ४ हजार ९९ कार्डधारक लाभार्थी आहेत. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी अंतर्गत २८ हजार १३६ कार्डधारक लाभार्थी आहेत. एकूण ३२ हजार २३५ शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. या शिधापत्रिकाधारकांना शहरातील १५ तर ग्रामीण भागातील १५० अशा १६५ रेशन दुकानांतून धान्याचे वितरण केले जात आहे. शासनाच्यावतीने मेमध्ये अंत्योदयसाठी १,५८१ क्विंटल गहू, ९१७ क्विंटल तांदूळ, प्राधान्य कुटुंबासाठी ९,०६० क्विंटल गहू, ६,०४० क्विंटल तांदळाचे मोफत वाटप होणार आहे. तर शेतकरी गटातील ६ हजार ७९२ शिधापत्रिकाधारकांना दरमहाप्रमाणे याही महिन्यात पैसे घेऊन धान्याचे वितरण होणार नाही. मे महिन्याचे धान्य वितरण सुरु करण्यात आले आहे. मेमध्ये नियमित धान्याबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील अंत्योदय, अन्नसुरक्षा लाभार्थी प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू, २ किलो तांदूळ मोफत वाटण्यात येणार आहे. शासनाच्या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबांना आधार मिळाला आहे.

पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार वाटप...

३२ हजार २३५ कुटुंबांना राज्य शासनाच्या मे २०२१चे नियमित असलेले धान्य अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना मोफत वाटप करण्याबाबतच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली रास्त भाव दुकानदारांमार्फत वाटप करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनामार्फत वरील लाभार्थींना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मे २०२१ व जून २०२१ या दोन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबत अतिरिक्त धान्याचे मोफत वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गहू ३ किलो, तांदूळ २ किलो याप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. हे धान्य वाटपासाठी बी. जी. मिट्टेवाड व गोदामपाल राजकुमार भगत (अहमदपूर) हे परिश्रम घेत आहेत.

- डी. के. मोरे, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, अहमदपूर