शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

राखी पौर्णिमेमुळे बसेसची संख्या वाढवली; प्रवासी संख्येतही मोठ्या प्रमाणात झाली वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST

लातूर : अनलॉक आणि राखी पौर्णिमेमुळे एस. टी. बसच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लातूर आगारातून उदगीर, ...

लातूर : अनलॉक आणि राखी पौर्णिमेमुळे एस. टी. बसच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लातूर आगारातून उदगीर, परभणी, वसमत, कळंब, हैदराबाद आदी ठिकाणी फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील मागणीनुसार बस सोडण्याचे नियोजन आगारप्रमुखांनी केले आहे.

लातूर आगारात सध्या ९३ बसेस आहेत. या बसेसच्या १८९ फेऱ्या सुरू आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उदगीरसाठी ४८ फेऱ्या होत्या, त्या आता ७२ करण्यात आल्या आहेत. परभणीसाठी २० फेऱ्या होत्या, त्या आता ३० करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरसाठी चार फेऱ्या होत्या, त्या आता पाच करण्यात आल्या आहेत. कळंबसाठी आठ फेऱ्या होत्या, त्या वाढवून वीस करण्यात आल्या आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे प्रवासी वाढत असून, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आवश्यकतेनुसार गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

प्रवाशांची गर्दी...

उदगीर, कळंब, निलंगा, अहमदपूर, परभणी, वसमत, हैदराबाद आदी मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवासी संख्या वाढल्यामुळे लातूर आगाराने वसमतसाठी सकाळ-संध्याकाळ दोनवेळा गाडी सोडली आहे.

या मार्गांवर वाढल्या फेऱ्या...

उदगीर, परभणी, कोल्हापूर, कळंब, वसमत, निलंगा, औसा तसेच ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. शंभर फेऱ्या होत्या, त्यात ८९ फेऱ्यांची वाढ झाली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर यात आणखीन वाढ होईल, असे आगार प्रमुखांनी सांगितले.

आगारप्रमुखांचा कोट...

लातूर आगाराच्या ९३ बसेस सध्या धावत आहेत. त्यांच्या १८९ फेऱ्या होत आहेत. यामुळे उत्पन्नातही वाढ होत आहे. सध्या बसस्थानकात चार गाड्या ठेवल्या आहेत. आवश्यकतेनुसार या बसेसच्या फेऱ्या वाढवल्या जातील.

- जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक, लातूर