शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

५४ गावांतील पावसाची नोंद तीनच केंद्रांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST

देवणी : तालुक्यात एकूण १६ तलाठी सज्जे असून त्याअंतर्गत ५४ महसुली गावे आहेत. मात्र, तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद केवळ ...

देवणी : तालुक्यात एकूण १६ तलाठी सज्जे असून त्याअंतर्गत ५४ महसुली गावे आहेत. मात्र, तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद केवळ तीन केंद्रांवरच घेतली जात आहे. परिणामी, अनेकदा अचूक नोंद होत नसल्याने सज्जानिहाय पर्जन्यमापक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

देवणी तालुक्यात तीन महसूल मंडळे असून १६ तलाठी सज्जाअंतर्गत ५४ महसुली गावे आहेत. देवणी, वलांडी व बोरोळ अशी तीन महसूल मंडळे आहेत. तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद ही या तीन महसूल मंडळांतील पर्जन्यमापकावर घेतली जाते. या तीन ठिकाणच्या नोंदींवरून संपूर्ण तालुक्यातील ५४ गावांतील पावसाची सरासरी गृहित धरली जाते.

या आकडेवारीनुसार शासनाच्या योजनांचा लाभ दिला जातो अथवा नियोजन ठरविले जाते.

गेल्या काही वर्षांपासून पाऊस लहरी स्वरूपाचा हाेत आहे. कधी गावात कमी पाऊस असतो तर त्याच गावच्या शिवारात अधिक पाऊस असतो. याशिवाय, काहीवेळा गावात अधिक पाऊस असतो परंतु, शेतात पावसाचा थेंबही नसतो. एका शिवारात पाऊस होतो, तर दुसऱ्या शिवारात पाऊस नसतो, अशी नैसर्गिक परिस्थिती आहे.

गावात झालेल्या पावसाचे अचूक मूल्यमापन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा फटका बसत आहे. विशेषत: पीकविम्याच्या आर्थिक मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागत आहे.

त्यामुळे तालुक्यात गावनिहाय अथवा किमान तलाठी सज्जानिहाय १६ ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.