शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
5
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
6
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
7
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
8
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
9
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
10
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
11
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
12
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
13
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
14
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
15
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
17
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
18
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
19
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
20
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल

केंद्राच्या कडक नियमांमुळे डाळ मिल कारखानदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

उदगीर : मराठवाड्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उदगीरच्या विकासात येथील डाळमिल उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे. परंतु केंद्र सरकारच्या कडक नियमांमुळे ...

उदगीर : मराठवाड्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उदगीरच्या विकासात येथील डाळमिल उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे. परंतु केंद्र सरकारच्या कडक नियमांमुळे कारखानदार अडचणीत सापडले आहेत. परिणामी, मजुरांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे.

उदगीर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या चार राज्यांच्या सीमेवरील येथील बाजारपेठ नावारूपाला आली आहे. या भागात उपलब्ध होणाऱ्या उच्चप्रतीच्या तुरीमुळे उदगीरची डाळ देशात प्रसिध्द असून चांगली मागणी आहे. त्यामुळे येथील बाजारात शेतकऱ्यांच्या तुरीला चांगला दर मिळतो. शहराच्या जवळपास ४० डाळ कारखाने आहेत. एका कारखान्यात जवळपास ५० कामगार काम करतात. त्यामुळे दोन हजार कुटुंबांना रोजगार मिळतो.

एमआयडीसीबाबत शासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. २१ फेबुवारी २०२० रोजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत राज्याच्या एमआयडीसीचे उपकार्यकारी अधिकारी संजय काटकर यांनी चांदेगाव, लिंबगाव येथे स्थळ पाहणी करून एमआयडीसी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. लोणी येथील सहकारी तत्वावरील उदयगिरी औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेत असलेल्या व इतर स्वतःच्या जागेत कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या डाळ उद्योगामुळे उदगीरचे नाव मुख्यत: दक्षिण भारतासह देशातील विविध भागात पोहोचले आहे.

तत्कालीन आमदार मनोहर पटवारी यांनी युती शासनाच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून ६१५ हेक्‍टरवर एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. लोणी मोडच्या सहकारी औद्योगिक वसाहतीपासून ते तोंडारच्या विकास सहकारी साखर कारखान्यापर्यंत नांदेड रोडपर्यंतची ही ६०० हेक्‍टर जमीन संपादित करण्याचा शासनाकडे प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानंतर राज्यात व उदगीर मतदारसंघात सत्तांतर झाल्याने उदगीरची एमआयडीसी पाठपुराव्याअभावी होऊ शकली नाही. त्यामुळे मोठे उद्योग येथे पोहोचू शकले नाहीत. उदगीरला २० वर्षांपूर्वीच एमआयडीसी झाली असती तर येथील डाळ उद्योगाने गरुडभरारी घेतली असती.

मागील चार वर्षांपासून येथील सोयाबीन, फुटाणा आणि अन्य उद्योगांतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. या भागातील अडत बाजार व शेतमालाची उपलब्धता पाहता महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने लवकरात लवकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी उदगीरकर करीत आहेत.

साठा मर्यादेची आता नवीन अडचण...

चार राज्यांच्या सीमेवर असलेल्या उदगीरचा व्यापार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. येथील विशिष्ट प्रकारच्या तुरीमुळे डाळ उद्योग भारतात प्रसिद्ध आहे. कुठलीही शासकीय मदत अथवा एमआयडीसीसारखा प्रकल्प नसतानाही केवळ स्वतःच्या ताकतीवर येथील व्यापाऱ्यांनी उदगीरात डाळीचे कारखाने उभे केले आणि टिकविले. परंतु, मागील काही वर्षांपासून नोटबंदी, जीएसटी व आता साठा मर्यादासारख्या केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे व्यापार करणे अवघड होत आहे. तरीदेखील येथील उद्योजक स्वतःच्या मेहनतीने कारखानदारी टिकवून आहेत.

- सुदर्शन मुंडे, अध्यक्ष, उदगीर दालमिल असोसिएशन.