शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या कडक नियमांमुळे डाळ मिल कारखानदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

उदगीर : मराठवाड्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उदगीरच्या विकासात येथील डाळमिल उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे. परंतु केंद्र सरकारच्या कडक नियमांमुळे ...

उदगीर : मराठवाड्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उदगीरच्या विकासात येथील डाळमिल उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे. परंतु केंद्र सरकारच्या कडक नियमांमुळे कारखानदार अडचणीत सापडले आहेत. परिणामी, मजुरांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे.

उदगीर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या चार राज्यांच्या सीमेवरील येथील बाजारपेठ नावारूपाला आली आहे. या भागात उपलब्ध होणाऱ्या उच्चप्रतीच्या तुरीमुळे उदगीरची डाळ देशात प्रसिध्द असून चांगली मागणी आहे. त्यामुळे येथील बाजारात शेतकऱ्यांच्या तुरीला चांगला दर मिळतो. शहराच्या जवळपास ४० डाळ कारखाने आहेत. एका कारखान्यात जवळपास ५० कामगार काम करतात. त्यामुळे दोन हजार कुटुंबांना रोजगार मिळतो.

एमआयडीसीबाबत शासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. २१ फेबुवारी २०२० रोजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत राज्याच्या एमआयडीसीचे उपकार्यकारी अधिकारी संजय काटकर यांनी चांदेगाव, लिंबगाव येथे स्थळ पाहणी करून एमआयडीसी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. लोणी येथील सहकारी तत्वावरील उदयगिरी औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेत असलेल्या व इतर स्वतःच्या जागेत कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या डाळ उद्योगामुळे उदगीरचे नाव मुख्यत: दक्षिण भारतासह देशातील विविध भागात पोहोचले आहे.

तत्कालीन आमदार मनोहर पटवारी यांनी युती शासनाच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून ६१५ हेक्‍टरवर एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. लोणी मोडच्या सहकारी औद्योगिक वसाहतीपासून ते तोंडारच्या विकास सहकारी साखर कारखान्यापर्यंत नांदेड रोडपर्यंतची ही ६०० हेक्‍टर जमीन संपादित करण्याचा शासनाकडे प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानंतर राज्यात व उदगीर मतदारसंघात सत्तांतर झाल्याने उदगीरची एमआयडीसी पाठपुराव्याअभावी होऊ शकली नाही. त्यामुळे मोठे उद्योग येथे पोहोचू शकले नाहीत. उदगीरला २० वर्षांपूर्वीच एमआयडीसी झाली असती तर येथील डाळ उद्योगाने गरुडभरारी घेतली असती.

मागील चार वर्षांपासून येथील सोयाबीन, फुटाणा आणि अन्य उद्योगांतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. या भागातील अडत बाजार व शेतमालाची उपलब्धता पाहता महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने लवकरात लवकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी उदगीरकर करीत आहेत.

साठा मर्यादेची आता नवीन अडचण...

चार राज्यांच्या सीमेवर असलेल्या उदगीरचा व्यापार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. येथील विशिष्ट प्रकारच्या तुरीमुळे डाळ उद्योग भारतात प्रसिद्ध आहे. कुठलीही शासकीय मदत अथवा एमआयडीसीसारखा प्रकल्प नसतानाही केवळ स्वतःच्या ताकतीवर येथील व्यापाऱ्यांनी उदगीरात डाळीचे कारखाने उभे केले आणि टिकविले. परंतु, मागील काही वर्षांपासून नोटबंदी, जीएसटी व आता साठा मर्यादासारख्या केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे व्यापार करणे अवघड होत आहे. तरीदेखील येथील उद्योजक स्वतःच्या मेहनतीने कारखानदारी टिकवून आहेत.

- सुदर्शन मुंडे, अध्यक्ष, उदगीर दालमिल असोसिएशन.