शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या कडक नियमांमुळे डाळ मिल कारखानदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

उदगीर : मराठवाड्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उदगीरच्या विकासात येथील डाळमिल उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे. परंतु केंद्र सरकारच्या कडक नियमांमुळे ...

उदगीर : मराठवाड्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उदगीरच्या विकासात येथील डाळमिल उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे. परंतु केंद्र सरकारच्या कडक नियमांमुळे कारखानदार अडचणीत सापडले आहेत. परिणामी, मजुरांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे.

उदगीर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या चार राज्यांच्या सीमेवरील येथील बाजारपेठ नावारूपाला आली आहे. या भागात उपलब्ध होणाऱ्या उच्चप्रतीच्या तुरीमुळे उदगीरची डाळ देशात प्रसिध्द असून चांगली मागणी आहे. त्यामुळे येथील बाजारात शेतकऱ्यांच्या तुरीला चांगला दर मिळतो. शहराच्या जवळपास ४० डाळ कारखाने आहेत. एका कारखान्यात जवळपास ५० कामगार काम करतात. त्यामुळे दोन हजार कुटुंबांना रोजगार मिळतो.

एमआयडीसीबाबत शासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. २१ फेबुवारी २०२० रोजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत राज्याच्या एमआयडीसीचे उपकार्यकारी अधिकारी संजय काटकर यांनी चांदेगाव, लिंबगाव येथे स्थळ पाहणी करून एमआयडीसी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. लोणी येथील सहकारी तत्वावरील उदयगिरी औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेत असलेल्या व इतर स्वतःच्या जागेत कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या डाळ उद्योगामुळे उदगीरचे नाव मुख्यत: दक्षिण भारतासह देशातील विविध भागात पोहोचले आहे.

तत्कालीन आमदार मनोहर पटवारी यांनी युती शासनाच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून ६१५ हेक्‍टरवर एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. लोणी मोडच्या सहकारी औद्योगिक वसाहतीपासून ते तोंडारच्या विकास सहकारी साखर कारखान्यापर्यंत नांदेड रोडपर्यंतची ही ६०० हेक्‍टर जमीन संपादित करण्याचा शासनाकडे प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानंतर राज्यात व उदगीर मतदारसंघात सत्तांतर झाल्याने उदगीरची एमआयडीसी पाठपुराव्याअभावी होऊ शकली नाही. त्यामुळे मोठे उद्योग येथे पोहोचू शकले नाहीत. उदगीरला २० वर्षांपूर्वीच एमआयडीसी झाली असती तर येथील डाळ उद्योगाने गरुडभरारी घेतली असती.

मागील चार वर्षांपासून येथील सोयाबीन, फुटाणा आणि अन्य उद्योगांतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. या भागातील अडत बाजार व शेतमालाची उपलब्धता पाहता महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने लवकरात लवकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी उदगीरकर करीत आहेत.

साठा मर्यादेची आता नवीन अडचण...

चार राज्यांच्या सीमेवर असलेल्या उदगीरचा व्यापार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. येथील विशिष्ट प्रकारच्या तुरीमुळे डाळ उद्योग भारतात प्रसिद्ध आहे. कुठलीही शासकीय मदत अथवा एमआयडीसीसारखा प्रकल्प नसतानाही केवळ स्वतःच्या ताकतीवर येथील व्यापाऱ्यांनी उदगीरात डाळीचे कारखाने उभे केले आणि टिकविले. परंतु, मागील काही वर्षांपासून नोटबंदी, जीएसटी व आता साठा मर्यादासारख्या केंद्र सरकारच्या जाचक अटींमुळे व्यापार करणे अवघड होत आहे. तरीदेखील येथील उद्योजक स्वतःच्या मेहनतीने कारखानदारी टिकवून आहेत.

- सुदर्शन मुंडे, अध्यक्ष, उदगीर दालमिल असोसिएशन.