शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

लातूरच्या बाजारपेठेत तुरीचे दर घसरले; मूग, सोयाबीन स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:07 IST

बाजारगप्पा : उत्पादन घटल्याने तुरीच्या दरात आणखीन वाढ होण्याची आशा व्यक्त होत असताना याच्या दरात अल्पशी घसरण झाली आहे़

- हरी मोकाशे (लातूर)

दीपावलीच्या पाडव्या दिवशी सर्वच शेतमालाला उच्चांकी दर मिळाला़ यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि शेती उत्पादन घटल्याने तुरीच्या दरात आणखीन वाढ होण्याची आशा व्यक्त होत असताना या शेतमालाच्या दरात अल्पशी घसरण झाली आहे़ मुग, सोयाबीनचा दर मात्र स्थिर आहे़ सोयाबीनला सध्या ३ हजार ४८१ रुपये असा भाव मिळत आहे़

आवक घटली की दरात वाढ होते, हा बाजारपेठेतील सर्वसाधारण नियम आहे़ लातूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून प्रामुख्याने सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते़ त्यापाठोपाठ तुरीचा पेरा असतो़ यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपातील शेतमालाच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे़ त्यामुळे सोयाबीनला सुरुवातीपासूनच ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता़ यंदा सोयाबीनला दर चांगला असला तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

 शासनाने सोयाबीनला ३ हजार ३९९ रुपये अशी आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी गत आठवड्यापासून खुल्या बाजारपेठेतील दर ३ हजार ४८१ रुपये पोहोचले आहेत़ त्यामुळे शेतकरी बाजारपेठेत सोयाबीन विक्री करीत आहेत़ शेतकऱ्यांच्या पदरी प्रति क्विं़ ज्यादा ४८० रुपये पडत आहेत़सध्या बाजारपेठेत गत वर्षीतील तुरीची आवक थोड्याफार प्रमाणात सुरु आहे़ दैनंदिन १६९ क्विं़ होणारी आवक स्थिर असली तरी गत आठवड्याच्या तुलनेत सध्या कमाल दरात ४०० रुपयांनी घट झाली आहे़ मुगाची आवक निम्म्याने घटली असून ६५२ क्विं़ आवक होत आहे़ कमाल दरात ७० रुपयांनी वाढ झाली असली तरी सर्वसाधारण दर स्थिर असून तो ५ हजार रुपये आहे़

बाजारपेठेत उडदाचीही आवक घटली आहे़  गत आठवड्याच्या तुलनेत कमाल दरात ५८३ रुपयांची घट झाली आहे़ सध्या ५ हजार २४० रुपये असा भाव मिळत आहे़ दरम्यान, पिवळ्या ज्वारीची आवक घटत असून दरात मोठी वाढ होत आहे़ सध्या २५३ क्विं़ आवक असून कमाल दर ४ हजार ६२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़  सध्या बाजारपेठेत बाजरीस प्रति क्विं़ १८००, गहू- २३००, हायब्रीड ज्वारी- १४००, रबी ज्वारी- ३५००, मका- १३००, हरभरा- ४ हजार ५५०, करडई- ३६५०, तीळ- १२ हजार ५००, गुळ- २ हजार ८९५, धन्यास ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे़

शासनाने मुगास ६ हजार ९७५ रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे़ परंतु, बाजारपेठेत भाव हा हमीभावाच्या जवळपासही एकदाही पोहोचला नाही़ त्यामुळे ज्यांच्याकडे मुग आहे, असे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करीत आहेत़ तसेच उडीद विक्रीसाठी अडीच हजार शेतकऱ्यांची नोंदणी असली तरी प्रत्यक्षात ३७ शेतकऱ्यांची १८९ क्विं़ खरेदी झाली आहे़ सोयाबीन विक्रीसाठी ७ हजार ७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे़ प्रत्यक्षात ११ पैकी एका केंद्रावर ११ शेतकऱ्यांची १०६ क्विं़ खरेदी झाली आहे़ खुल्या बाजारपेठेत सोयाबीन विक्री केल्यानंतर विनाविलंब हाती रक्कम पडत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजारपेठेकडे आहे़

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी