शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; सरसकट अनुदान, पीकविम्यासाठी जळकोटात रास्तारोको

By हरी मोकाशे | Updated: September 30, 2022 15:53 IST

यंदा अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव आणि यल्लो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जळकोट (जि. लातूर) : अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव व यल्लो मोझॅकमुळे तालुक्यातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर केली. परंतु, सरसकट अनुदान आणि पीकविमा देण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर मनसे, शेतकऱ्यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यंदा अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव आणि यल्लो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लागवडीसाठीचा खर्चही पदरी पडण्याची आशा धूसर झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के आगावू रक्कम देण्याचे आदेश दिले असले तरी त्यात चार तालुक्यातील केवळ १४ महसूल मंडळांचा समावेश आहे.

वास्तविक, तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली आहे. पीक उगवल्यानंतर अतिवृष्टी, गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला. त्यातून बचावलेल्या सोयाबीनवर येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते. तसेच पीकविम्याची २५ टक्के आगावू रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु, शासनाने त्याचा लाभ दिला नाही.

जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, पीकविमा मंजूर करावा, या मागणीसाठी शुक्रवारी मनसेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिवशेट्टे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष महेश देशमुख, तालुका सचिव मधुकर बादुलगे, लक्ष्मण लांडगे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष शिवम चंदनशिवे, गजानन पद्मपल्ले, ऋषिकेश भोंग, वैजनाथ केंद्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर