शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'सरसकट पीकविमा द्या'; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लातूर- मुरुड मार्गावर चक्काजाम

By हरी मोकाशे | Updated: February 22, 2023 16:05 IST

शेतकरी जगाचा पोशिंदा असतानाही सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.

बोरगाव काळे ( लातूर) : पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पीकविमा द्यावा. सरकारने रासायनिक खतांचे भाव कमी करावेत, शेती पंपांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी लातूर- मुरुड मार्गावरील लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे बुधवारी सकाळी ११.३० वा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तासभर झाले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

शेतकरी जगाचा पोशिंदा असतानाही सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरी विविध मार्गांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यास येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार जाधव, जिल्हाध्यक्ष धर्मराज शिंदे- पाटील, उपाध्यक्ष महारुद्र चौंडे, तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, विद्यार्थी परिषद आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर शेख, आंबऋषी काळे, विलास कारखान्याचे संचालक भारत आदमाने, करण साखरे, निळकंठ काळे, संदीपान फोलाने, बाळासाहेब मेनकुदळे, प्रकाश सोनपेठकर, आबासाहेब साखरे, भास्कर काळे, संतोष सोनपेठकर, ज्ञानेश्वर मायंदे, सचिन काळे, गणेश चौंडे, प्रेमचंद पाचपिंडे, परमेश्वर काळे आदी उपस्थित होते.

प्रस्तावित वीज दरवाढ थांबवावी...शेतीमालासाठी किमान हमीभाव व कायदा मंजूर करून घेण्यात यावा, प्रास्तावित वीज दरवाढ थांबवावी, भूसंपादनाचा मोबदला पूर्वीप्रमाणे देण्यात यावा, देशातील १५ लाख मे. टन सोया पेंड निर्यात करावी. तेलबिया व खाद्यतेलावर ४० टक्के आयात शुल्क लावावा, सोयाबीनला किमान ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा. ऊसाला एफआरपीची एकरकमी रक्कम तात्काळ मिळावी. बुलढाणा येथे शेतकरी, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन मुरुडचे मंडळ अधिकारी अनिल सूर्यवंशी, सपोनि धनंजय ढोणे यांना देण्यात आले. व्हीएस पँथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर