शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लातूरच्या जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा

By हरी मोकाशे | Updated: November 22, 2023 17:55 IST

शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी

लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत (एनएचएम) च्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी तीन आठवड्यांपासून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून राज्य शासनाच्या धोरणावर संताप व्यक्त केला.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी जवळपास तीन आठवड्यांपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना, कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटना यासह अन्य विविध संघटनांचा समावेश आहे. दरम्यान, गत आठवड्यात येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात चटणी-भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले.

बुधवारी जिल्हा परिषदपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कायम करावे, अशा मागणीच्या घोषणा देत लक्ष वेधून घेण्यात आले. एकच नारा, कायम करा, माझे समायोजन, माझी जबाबदारी असे हातात फलक घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन