शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सिंचन विहिरीसाठी मोबाईलवरून प्रस्ताव; लातूर जिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम

By हरी मोकाशे | Updated: January 15, 2024 19:00 IST

लातूर जिल्ह्यात ११ हजार ७९० विहिरींचे उद्दिष्ट

लातूर : शेती उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर देण्यात येत आहे. दरम्यान, प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी म्हणून शासनाने आता मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. त्यामुळे घरबसल्या आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून मोबाईलवरून ॲपद्वारे प्रस्ताव सादर करता येत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे नुकसान होते. शिवाय, जलस्रोत नसल्याने बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात; मात्र त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत नाही. सिंचनाचे क्षेत्र वाढावे आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर देण्यात येते. योजनेंतर्गत विहिरीसाठी अडीच लाखांचे अनुदान देण्यात येत होते. दोन वर्षांपासून त्यात वाढ करण्यात येऊन ४ लाखांचे अनुदान दिले जात आहे. योजनेंतर्गत सिंचन विहीर, शेततळे खोदण्याबरोबर फळबाग लागवडही करता येते.

घरबसल्या दाखल करता येईल अर्ज...मोबाईल प्ले स्टोअरमधून egshorti नावाचे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. या ॲपच्या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल करता येतात. प्रस्तावासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईनरित्या दाखल करावी. विशेषत: घरबसल्या अर्ज दाखल करता येतो. हा प्रस्ताव थेट गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचतो.

४ हजार विहिरींच्या खोदकामास सुरुवात...जिल्ह्यात ११ हजार ७९० सिंचन विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ॲपद्वारे १ हजार ७३ अर्ज दाखल झाले आहेत. ऑफलाईनरित्या पंचायत समितीकडे ८ हजार ४६९ प्रस्ताव दाखल आहेत. त्यापैकी ७ हजार ३३ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सध्या ३ हजार ७३८ विहिरींच्या कामांना सुरुवात झाली आहे.

निलंगा तालुक्यास सर्वाधिक उद्दिष्ट...तालुका - उद्दिष्ट - ॲपद्वारे अर्जअहमदपूर - १४५५ - १०६औसा - १६३५ - १३९चाकूर - १०६५ - ११४देवणी - ६७५ - ५०जळकोट - ६४५ - १७९लातूर - १६६५ - ३८निलंगा - १७४० - १६७रेणापूर - ९७५ - ५६शिरुर अनं. - ६३० - २५उदगीर - १३०५ - १९९एकूण - ११७९० - १०७३

औसा तालुक्यात सर्वाधिक कामे सुरू...सिंचन विहीर खोदकामाची सर्वाधिक कामे औसा तालुक्यात सुरू झाली असून ती ७२२ अशी आहेत. अहमदपुरात ३७९, चाकूर - ५४३, देवणी - ३४६, जळकोट - १४०, लातूर - ३९२, निलंगा- ३९२, रेणापूर- ३६१, शिरुर अनंतपाळ- १४६ आणि उदगीर तालुक्यात ३१७ कामे सुरू झाली आहेत. एकूण ३ हजार ७३८ विहिरींची कामे सुरू आहेत.

ॲपद्वारे अर्ज दाखल करावेत...ॲपच्या माध्यमातून सहजरित्या सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल करता येतो. त्यामुळे नागरिकांनी ॲपचा वापर करावा. तसेच ॲपमुळे लवकरात लवकर प्रस्तावास मंजुरी मिळण्यास मदत होईल. शिवाय, पारदर्शकता आणखीन वाढणार आहे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र