पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. तालुक्यातील १२३ गावांपैकी ४४ गावांतील पाणीटंचाईचे ५२ प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले असून, त्यातील ८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, तर १७ प्रस्तावांवर आदेश देण्यात आले आहेत. अनेक प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत. सदर प्रस्ताव पंचायत समितीने उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले असून, जिल्हा पातळीवर प्रस्तावास अद्याप मंजुरी मिळाली नाही. यामध्ये वैरागड, गादेवाडी, काळेगाव, नरवटवाडी, कोकणगाव, विळेगाव, खंडाळी, जांब, माकणी, भुतेकरवाडी, अजनी खुर्द, थावर तांडा, चिलगरवाडी, टाकळगाव का., नांदुरा, उमरगा, येल्लादेवी, असेवाडी, गुंजोटी, मालेगाव, सावरगाव, रोकडा, जोडवाडी, मांडणी, वरवटी, वरवटी तांडा, शेंद्री, सलगरा, परचंडा, कोळवाडी, शेंदरी, खरबवाडी, जोडवाडी, हिप्परगा, कोपदेव, गोताळा, येरमेवाडी, तळेगाव या गावांचा समावेश आहे. गावातील बोअरवेल व विहिरी अधिग्रहीत करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समितीकडे पाठविले असून, सदर प्रस्ताव जिल्हा पातळीवर प्रलंबित असल्याचे पंचायत समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर...
प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून निर्णय...
सदरील प्रस्तावांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून गरजेनुसार निर्णय घेतला जाणार आहे. नायब तहसीलदार स्वतः स्थळ पाहणी करणार असून, ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी तत्काळ अधिग्रहणाचे मंजुरी आदेश देण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी सांगितले.