शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

लातुरात भाजीपाल्यांचा भाव घसरला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST

सध्या किराणा मालाचे दर मात्र स्थिर ! लातूर : शहरासह जिल्ह्यातील आठवडी बाजारात दिवाळीनंतर टप्प्या-टप्प्याने भाजीपाल्यांचे दर घसरले. ...

सध्या किराणा मालाचे दर मात्र स्थिर !

लातूर : शहरासह जिल्ह्यातील आठवडी बाजारात दिवाळीनंतर टप्प्या-टप्प्याने भाजीपाल्यांचे दर घसरले. सध्या भाजीपाला कवडीमोल किंमतीत विक्री केला जात आहे. तर किराणा मालाचे दर दोन आठवड्यांपासून स्थिर आहेत. ३० रुपयांना मिळणारी मेथीची पेंढी आता ३ रुपयांवर आली आहे. १० रुपयांत तीन ते चार पेंढ्या दिल्या जात आहेत.

दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्य तेलासह हरभरा डाळीचे भाव वधारले होते. आता दिवाळीनंतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत. सध्या साखर ३५ रुपये किलो दराने विकली जात आहे. खाद्य तेल १२० रुपये, पामतेल १०५ रुपये, खोबरं १६० रुपये, हरभरा डाळ प्रति किलो ७५ ते ८० रुपये, तूर डाळ १०५, मसूर डाळ ९० रुपये, मूगदाळ आणि उडीद डाळीचा प्रति किलो ११५ रुपयांचा भाव आहे. दिवाळीच्या दरम्यान लातूरच्या भाजी मंडईत भाजीपाल्यांचे प्रति किलोचे भाव शंभरीच्या घरात होते. आता ते २० रुपयांच्या घरात आले आहेत. तब्बल ७० ते ८० टक्के भाव घसरले आहेत. १२० रुपये किलोने मिळणारी फुलकोबी सध्या १० ते १५ रुपये किलो मिळत आहे. पत्ताकोबी २५, वांगी २५, बटाटे ४०, भेंडी ३०, गवार ५०, दोडका ३०, टोमॅटो ३०, गाजर ४०, भोपळा २०, पालक १०, कांदापात ८, हिरवी मिरची ३० रुपये, कोथिंबीर १०, चुका ७०, वरणा ४० रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे.

ऐन दिवाळीत कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. प्रति किलो ८० रुपयांच्या घरात भाव गेला होता. आता कांद्याचे भावही टप्प्या-टप्प्याने घसरू लागले आहेत. प्रति किलो ३५ ते ५० रुपये दराने कांदा मिळत आहे. सर्वाधिक भाव चुक्याचा आहे. प्रति किलो ७० रुपयाने नागरिकांना चुका विकत घ्यावा लागत आहे.

लातूर येथील फळबाजारात चिकू, मोसंबी, केळी आणि सफरचंदाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सफरचंद प्रति किलो सध्या ८० ते १०० रुपये दराने मिळत आहे. चिकू ५० रुपये किलो दराने तर मोसंबी ५० ते ६० रुपये आणि केळी ४० रुपये डझनाने मिळत आहे.

दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्य तेलाबरोबर डाळींचे भाव वाढले होते. आता ते भाव स्थिर झाले आहेत. साखरेचा भाव मात्र दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतरही ३५ रुपयेच आहे. त्यापाठोपाठ खाद्य तेल प्रति किलो १२० रुपये आहे. किराणाचे दर स्थिर आहेत.

-निलेश हलगरकर,

हिवाळ्याच्या हंगामात फळांना मोठी मागणी असते. रानमेवा असलेल्या सीताफळासह सफरचंद, चिकू, संत्रा, केळी आणि इतर फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या चिकू आणि सफरचंदाची मागणी मोठी आहे. त्यांचे भावही शंभराच्या आत आहेत.

- बाबा शेख,

लातूरसह जिल्हाभरातील बाजारात भाजीपाला कवडीमोल झाला आहे. प्रति किलो १० ते २० रुपयांच्या घरात विकला जात आहे. यातून भाजी विक्रेत्यांचा रोजगारही निघत नसल्याचे चित्र आहे. मेथी, कोथिंबीर आणि इतर भाजीपाल्याचे दर घसरले आहेत.

- भीमा शिंदे,