शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बाजारपेठेत तुरीचे दर वधारले; पण सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच, शेतकऱ्यांची चिंता वाढली

By संदीप शिंदे | Updated: January 17, 2024 17:50 IST

उदगीर बाजार समिती : बुधवारी तुरीस मिळाला ९२०० रुपयांचा भाव

उदगीर : मागील दोन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी उदगीर मार्केट यार्ड सुरू झाले. बाजारात तूर व सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होती. मागील पंधरवड्यात तुरीच्या दरात झालेली घसरण आता थांबली असून, तुरीचे दर वाढलेले आहेत. परंतु, सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. त्यामुळे हे दर कधी वाढतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होऊन ८ हजार ६०० रुपयांपर्यंत दर खाली आला होता. हंगामाच्या सुरुवातीला असलेला ११ हजार रुपयांचा दर ८५००च्या घरात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या होत्या. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीला तरी चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तूर, वाटाणा या कडधान्याची आयात करण्यास परवानगी दिल्यामुळे तुरीच्या दरात घसरण झाली होती.

परंतु, आयातीत माल येण्यास वेळ असल्याकारणाने व सध्या डाळीला मागणी चांगली असल्याने तूर दरात वाढ होऊन बुधवारी चांगल्या प्रकारच्या तुरीची ९ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे तुरीचे पीक मोजक्याच शेतकऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांकडे तुरीचे पीक हाती लागलेले आहे. उदगीर भागातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मात्र दिवसेंदिवस घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला ५ हजार २०० रुपये असलेला दर वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्री करण्याच्या ऐवजी घरीच साठवून ठेवलेला आहे.

आयात वाढत असल्याने दरात घसरण...चालू वर्षामध्ये लोकसभेची निवडणूक होणार असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढू न देण्याच्या मन:स्थितीत शासन असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे स्टॉक लिमिटसारखे नियम करून व्यापाऱ्यांची कोंडी करण्यात आलेली आहे. सोबतच देशांतर्गत चांगले उत्पादन झालेले असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात कडधान्य व खाद्यतेलाची आयात दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

सोयाबीनला ४६७० रुपयांचा मिळाला दर...परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे रब्बीचे उत्पादन झालेले नाही. शेतकऱ्यांकडे सोयाबीनचेच पीक शिल्लक आहे. त्यालाही भाव नसल्यामुळे बी-बियाणे, खते, फवारणीचे औषधे यांचा खर्च वजा जाता हाती काहीच शिल्लक राहत नाही. परिणामी, शेतकरी सोयाबीन विक्री करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. ज्यांना आर्थिक अडचण आहे, असे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत, बुधवारी बाजारात सोयाबीन ४ हजार ६७० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र