शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाजारपेठेत तुरीचे दर वधारले; पण सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच, शेतकऱ्यांची चिंता वाढली

By संदीप शिंदे | Updated: January 17, 2024 17:50 IST

उदगीर बाजार समिती : बुधवारी तुरीस मिळाला ९२०० रुपयांचा भाव

उदगीर : मागील दोन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी उदगीर मार्केट यार्ड सुरू झाले. बाजारात तूर व सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होती. मागील पंधरवड्यात तुरीच्या दरात झालेली घसरण आता थांबली असून, तुरीचे दर वाढलेले आहेत. परंतु, सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. त्यामुळे हे दर कधी वाढतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होऊन ८ हजार ६०० रुपयांपर्यंत दर खाली आला होता. हंगामाच्या सुरुवातीला असलेला ११ हजार रुपयांचा दर ८५००च्या घरात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या होत्या. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीला तरी चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तूर, वाटाणा या कडधान्याची आयात करण्यास परवानगी दिल्यामुळे तुरीच्या दरात घसरण झाली होती.

परंतु, आयातीत माल येण्यास वेळ असल्याकारणाने व सध्या डाळीला मागणी चांगली असल्याने तूर दरात वाढ होऊन बुधवारी चांगल्या प्रकारच्या तुरीची ९ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे तुरीचे पीक मोजक्याच शेतकऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांकडे तुरीचे पीक हाती लागलेले आहे. उदगीर भागातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मात्र दिवसेंदिवस घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला ५ हजार २०० रुपये असलेला दर वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्री करण्याच्या ऐवजी घरीच साठवून ठेवलेला आहे.

आयात वाढत असल्याने दरात घसरण...चालू वर्षामध्ये लोकसभेची निवडणूक होणार असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढू न देण्याच्या मन:स्थितीत शासन असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे स्टॉक लिमिटसारखे नियम करून व्यापाऱ्यांची कोंडी करण्यात आलेली आहे. सोबतच देशांतर्गत चांगले उत्पादन झालेले असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात कडधान्य व खाद्यतेलाची आयात दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

सोयाबीनला ४६७० रुपयांचा मिळाला दर...परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे रब्बीचे उत्पादन झालेले नाही. शेतकऱ्यांकडे सोयाबीनचेच पीक शिल्लक आहे. त्यालाही भाव नसल्यामुळे बी-बियाणे, खते, फवारणीचे औषधे यांचा खर्च वजा जाता हाती काहीच शिल्लक राहत नाही. परिणामी, शेतकरी सोयाबीन विक्री करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. ज्यांना आर्थिक अडचण आहे, असे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत, बुधवारी बाजारात सोयाबीन ४ हजार ६७० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र