शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

बाजारपेठेत तुरीचे दर वधारले; पण सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच, शेतकऱ्यांची चिंता वाढली

By संदीप शिंदे | Updated: January 17, 2024 17:50 IST

उदगीर बाजार समिती : बुधवारी तुरीस मिळाला ९२०० रुपयांचा भाव

उदगीर : मागील दोन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी उदगीर मार्केट यार्ड सुरू झाले. बाजारात तूर व सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होती. मागील पंधरवड्यात तुरीच्या दरात झालेली घसरण आता थांबली असून, तुरीचे दर वाढलेले आहेत. परंतु, सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. त्यामुळे हे दर कधी वाढतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होऊन ८ हजार ६०० रुपयांपर्यंत दर खाली आला होता. हंगामाच्या सुरुवातीला असलेला ११ हजार रुपयांचा दर ८५००च्या घरात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या होत्या. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीला तरी चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तूर, वाटाणा या कडधान्याची आयात करण्यास परवानगी दिल्यामुळे तुरीच्या दरात घसरण झाली होती.

परंतु, आयातीत माल येण्यास वेळ असल्याकारणाने व सध्या डाळीला मागणी चांगली असल्याने तूर दरात वाढ होऊन बुधवारी चांगल्या प्रकारच्या तुरीची ९ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे तुरीचे पीक मोजक्याच शेतकऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांकडे तुरीचे पीक हाती लागलेले आहे. उदगीर भागातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मात्र दिवसेंदिवस घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला ५ हजार २०० रुपये असलेला दर वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्री करण्याच्या ऐवजी घरीच साठवून ठेवलेला आहे.

आयात वाढत असल्याने दरात घसरण...चालू वर्षामध्ये लोकसभेची निवडणूक होणार असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढू न देण्याच्या मन:स्थितीत शासन असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे स्टॉक लिमिटसारखे नियम करून व्यापाऱ्यांची कोंडी करण्यात आलेली आहे. सोबतच देशांतर्गत चांगले उत्पादन झालेले असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात कडधान्य व खाद्यतेलाची आयात दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

सोयाबीनला ४६७० रुपयांचा मिळाला दर...परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे रब्बीचे उत्पादन झालेले नाही. शेतकऱ्यांकडे सोयाबीनचेच पीक शिल्लक आहे. त्यालाही भाव नसल्यामुळे बी-बियाणे, खते, फवारणीचे औषधे यांचा खर्च वजा जाता हाती काहीच शिल्लक राहत नाही. परिणामी, शेतकरी सोयाबीन विक्री करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. ज्यांना आर्थिक अडचण आहे, असे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत, बुधवारी बाजारात सोयाबीन ४ हजार ६७० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र