शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बाजारपेठेत तुरीचे दर वधारले; पण सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच, शेतकऱ्यांची चिंता वाढली

By संदीप शिंदे | Updated: January 17, 2024 17:50 IST

उदगीर बाजार समिती : बुधवारी तुरीस मिळाला ९२०० रुपयांचा भाव

उदगीर : मागील दोन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी उदगीर मार्केट यार्ड सुरू झाले. बाजारात तूर व सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होती. मागील पंधरवड्यात तुरीच्या दरात झालेली घसरण आता थांबली असून, तुरीचे दर वाढलेले आहेत. परंतु, सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. त्यामुळे हे दर कधी वाढतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होऊन ८ हजार ६०० रुपयांपर्यंत दर खाली आला होता. हंगामाच्या सुरुवातीला असलेला ११ हजार रुपयांचा दर ८५००च्या घरात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या होत्या. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीला तरी चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तूर, वाटाणा या कडधान्याची आयात करण्यास परवानगी दिल्यामुळे तुरीच्या दरात घसरण झाली होती.

परंतु, आयातीत माल येण्यास वेळ असल्याकारणाने व सध्या डाळीला मागणी चांगली असल्याने तूर दरात वाढ होऊन बुधवारी चांगल्या प्रकारच्या तुरीची ९ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे तुरीचे पीक मोजक्याच शेतकऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांकडे तुरीचे पीक हाती लागलेले आहे. उदगीर भागातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मात्र दिवसेंदिवस घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला ५ हजार २०० रुपये असलेला दर वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्यांचा माल विक्री करण्याच्या ऐवजी घरीच साठवून ठेवलेला आहे.

आयात वाढत असल्याने दरात घसरण...चालू वर्षामध्ये लोकसभेची निवडणूक होणार असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढू न देण्याच्या मन:स्थितीत शासन असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे स्टॉक लिमिटसारखे नियम करून व्यापाऱ्यांची कोंडी करण्यात आलेली आहे. सोबतच देशांतर्गत चांगले उत्पादन झालेले असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात कडधान्य व खाद्यतेलाची आयात दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

सोयाबीनला ४६७० रुपयांचा मिळाला दर...परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दगा दिल्यामुळे रब्बीचे उत्पादन झालेले नाही. शेतकऱ्यांकडे सोयाबीनचेच पीक शिल्लक आहे. त्यालाही भाव नसल्यामुळे बी-बियाणे, खते, फवारणीचे औषधे यांचा खर्च वजा जाता हाती काहीच शिल्लक राहत नाही. परिणामी, शेतकरी सोयाबीन विक्री करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. ज्यांना आर्थिक अडचण आहे, असे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत, बुधवारी बाजारात सोयाबीन ४ हजार ६७० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र