शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST

लातूर : गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमानाचा अंदाज नेहमीच अप्रत्याशित राहत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ...

लातूर : गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमानाचा अंदाज नेहमीच अप्रत्याशित राहत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली होती. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी अथवा अशी वेळ येऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून मान्सूनपूर्व तयारी करत असताना जिल्ह्यातील सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, केटी वेअर्स, स्टोरेज टॅंक व इतर प्रकल्पांची व पुलांची तपासणी करून खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून २०२१ पूर्वतयारीबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जलसंधारण, जलसंपदा, पाटबंधारे, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून मान्सूनपूर्व तयारी करत असताना यंदा या आपत्ती व्यवस्थापनाला कोविड संसर्गाची पार्श्वभूमी आहे. त्यादृष्टीने गाव ते जिल्हा मुख्यालय स्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्वतयारी करुन अधिक सतर्कतेने सज्ज राहावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व जुन्या, नव्या पुलांची तपासणी करुन घ्यावी. पाटबंधारे विभागाने सर्व लहान-मोठ्या प्रकल्पांच्या स्थितीची प्रत्यक्ष तपासणी करुन फोटोसह अहवाल सादर करावा. पूर व्यवस्थापनासाठी नदीकाठावरील तसेच पूरप्रवण गावांमध्ये संपर्क यंत्रणा व खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. प्रत्येक तालुक्यात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा. पावसाळ्यात सर्व शासकीय यंत्रणांची संपर्क यंत्रणा सुसज्ज असली पाहिजे. त्यावरुन वेळचेवेळी संदेश व आवश्यक माहितीची देवाण-घेवाण झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

दुरुस्ती परीक्षणाचा सविस्तर आढावा...

लातूर जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्त्यावरील पुलांचे व पाटबंधारे विभागाचे प्रकल्प, केटी वेअर, पाझर तलाव दुरुस्तीबाबतच्या लेखा परीक्षणाचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठकीत सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक तालुकास्तरावर असणाऱ्या नियंत्रण कक्षाचे येत्या १ जूनपासून आठवड्यातून सात दिवस कार्यान्वित असणे आवश्यक आहे. याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले.