शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

लातूरमध्ये मान्सूनपूर्व कामे खोळंबलेलीच; दैनंदिन कामातून सफाई कामगारांना वेळ मिळेना

By हणमंत गायकवाड | Updated: May 21, 2024 18:16 IST

महापालिकेचे अनेक वाहने नादुरुस्त: गुत्तेदारांवर कामांची भिस्त

लातूर: महापालिकेच्या सफाई विभागात तीनशेच्या आसपास कर्मचारी असले तरी या कर्मचाऱ्यांवर दैनंदिन कामाचा मोठा भार असल्यामुळे मान्सूनपूर्व कामे खोळंबलेली आहेत. त्यामुळे मनपाला खासगी गुत्तेदारामार्फत मान्सूनपूर्व कामे करून घ्यावी लागत आहेत. शिवाय, या कामी महत्त्वाची असणारी वाहने बंद पडलेली आहेत. त्या वाहनांवरच काम भागविण्याची वेळ मनपावर आली आहे.

मनपाच्या मालकीची एकूण ८३ वाहने आहेत. त्यातील ३३ वाहने बंद पडले आहेत. ४७ वाहने चालू आहेत. रिफिज टँकर चार आहेत. तर कटर मशीन गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. छोट्या जेसीबी सहा आहेत. या वाहनांवर आणि गुत्तेदरांकडील कामगारांवर मान्सून पूर्व कामे केली जात आहेत. लातूर शहरांमध्ये सकल भागात पावसाळ्यात पाणी साचणे नाल्या तुंबणे, घरात पाणी शिरणे, अशा घटना घडतात. या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व कामे करून घेणे महत्त्वाचे आहेत. मोठ्या-मोठ्या नाल्यांमध्ये गाळ किंवा कचरा पडून पाणी अडते. त्यामुळे या नाल्या साफ करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने या कामाला प्रारंभ केला असला तरी मनपाचे कर्मचारी ते काम करत नाहीत. खासगी गुत्तेदारांमार्फत काम केले जाते. दैनंदिन कामकाजातून सफाई कामगारांना तिकडे ड्युटी दिली जात नाही, असे स्वच्छता विभागातून सांगण्यात आले.

लातूर शहरात या भागातील घरांनी पाणी शिरते...दरवर्षी शहरातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच आणि लातूर शहरातील पूर्व भागातील सकल भागात वास्तव्य असणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी पावसाचे पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. रस्त्यावर पाणी साचले जाते. नाल्यात तुंबल्या जातात. यामुळे जनजीवन विस्कळीत होते. नागरिकांची पावसाळ्यात अशी गैरसोय होऊ नये म्हणून मान्सूनपूर्व कामे होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका