शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला स्थगिती; विद्यार्थ्याच्या तयारीवर पाणी !

By संदीप शिंदे | Updated: October 7, 2022 19:57 IST

केंद्राच्या मान्यतेची प्रतीक्षा : जिल्ह्यात दरवर्षी २ हजाराहून विद्यार्थी देतात परीक्षा

- संदीप शिंदेलातूर : जिल्ह्यातून प्रतिवर्षी २ हजारांहून अधिक विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा देतात. यामध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी परीक्षार्थ्यांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेची तयारीही करीत आहेत. मात्र, या परीक्षेला केंद्र सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याने या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. आता केंद्राकडून केव्हा मान्यता मिळते, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे.

दरवर्षी राज्यस्तरावर मार्चमध्ये आणि देशपातळीवर डिसेंबरमध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा होते. यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रतिमहिना २ हजार रुपये असे वर्षाकाठी एकूण २४ हजारांची शिष्यवृत्ती पीएचडीचे शिक्षण होईपर्यंत मिळते. सोबत स्पर्धा परीक्षेचीही तयारी होते.जिल्ह्यातून जवळपास २ हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. मागील वर्षी राज्यातून ७७४ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यापैकी जिल्ह्यातील ५४ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर पोहचले. तर यातील १४ विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. त्यामुळे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली असून, परीक्षेला स्थगिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील १२३ शाळांचा सहभाग...एनटीएसई परीक्षेसाठी जिल्ह्यातील १२३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली जाते. यामध्ये लातूर ५९, अहमदपूरी १२, चाकूर ८, जळकोट २, शिरुर अनंतपाळ ३, देवणी ५, उदगीर १२, औसा ११, रेणापूर ५, निलंगा तालुक्यातील ६ शाळांचा समावेश आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

वर्षांला मिळतात २४ हजार रुपये...प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ वी ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेताना प्रतिमहा २ हजार याप्रमाणे वर्षांला २४ हजार रुपये मिळतात. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक हातभारही लागतो. मात्र, परीक्षेला स्थगिती देण्यात आल्याने परीक्षा होणार की नाही असा प्रश्न विद्यार्थी, पालकांसमोर उपस्थित झाला आहे.

निर्णयाचा पुर्नविचार करण्याची गरज...एनटीएसई परीक्षेतून गुणवंत विद्यार्थी समोर येतात. सोबतच स्पर्धा परीक्षेचही तयारी होते. उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतही होते. मात्र, परीक्षा स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्याचे नुकसान करणार आहे. यावर फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. - गोविंद शिंदे, मुख्याध्यापक

३१ मार्चपर्यंतच होती मुदत...राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा केंद्राच्या शिक्षण विभागाकडून एनसीईआरटीच्या माध्यमातून घेतली जाते. या परीक्षेस ३१ मार्च २०२१ पर्यंतच मुदत होती. मुदत वाढविण्याबाबत केंद्र शासनस्तरावर निर्णय होणार आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याचे एनसीईआरटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :examपरीक्षाlaturलातूरEducationशिक्षण