शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

नागरिकांच्या जिवाशी खेळ! दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी लातूर मनपाचे महामार्गाकडे बोट

By संदीप शिंदे | Updated: July 8, 2023 17:57 IST

खाडगाव रिंगरोडलगत रामरहिम नगर, विराट नगर भागात जवळपास तीन एकरावर जागेत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे.

लातूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे लातूर शहरालगत अनेक भागातील मनपाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी जमा होत आहे. पावसाचे पाणी निघत नसल्याने दुर्गंधी वाढली. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर मनपाने या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बोट दाखवले आहे. त्यांना पत्र देण्यात आले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पीव्हीआर चौक ते औसा रोड हा रस्ता करीत असताना शहरातून बाहेर जाणाऱ्या नाल्यास बॉक्स कल्वर्ट बांधणे आवश्यक होते, परंतू तसे झाले नाही. आपल्या रेन वॉटरचा बेड लेवलसुध्दा उंच झाला आहे. त्यामुळे शहरातील रोडलगत पाणी साचून घाण पाण्याचे तळे साचत आहेत. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. साचलेले घाण पाणी वाहून नेण्यासाठी आपण त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे महामार्ग विभागाला देण्यात आलेल्या पत्रात मनपाचे शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी नमूद केले आहे.

विराट नगरात शिरते पाणी...खाडगाव रिंगरोडलगत रामरहिम नगर, विराट नगर भागात जवळपास तीन एकरावर जागेत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. पाऊस झाला की विराट नगर येथील जवळपास पाच ते सहा जणांच्या घरात पाणी शिरते. शिवाय, खाडगाव स्मशानभूमीसमोर मुख्य रस्त्याने पाणी वाहते. पाणी निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

रस्ता कामात नळ्या टाकणे चुकले...राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असताना पाण्याचा निचरा करण्यासाठी नळ्या टाकण्यात आल्या आहेत. नळ्या न टाकता बॉक्स कल्वर्ट पध्दतीचे पूल बांधले असते तर सहजपणे पाणी निचरा झाला असता. बेडची उंची वाढल्याने पाणी जात नाही, आता या चुका सुधारणे गरजेचे असले तरी पुढाकार घ्यायचा कोण, असा प्रश्न आहे. मनपा, महामार्गविभागाकडे बोट दाखवत आहे.

नागरिकांच्या जिवाशी खेळ...मनपा, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या खेळात नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळत आहे. बारमाही पाणी थांबलेले असतानाही कोणी दखल घेत नाही. शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठविले. या पत्राची महामार्ग विभाग कधी दखल घेणार असा प्रश्न आहे. सध्या तरी या भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका