शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागरिकांच्या जिवाशी खेळ! दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी लातूर मनपाचे महामार्गाकडे बोट

By संदीप शिंदे | Updated: July 8, 2023 17:57 IST

खाडगाव रिंगरोडलगत रामरहिम नगर, विराट नगर भागात जवळपास तीन एकरावर जागेत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे.

लातूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे लातूर शहरालगत अनेक भागातील मनपाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी जमा होत आहे. पावसाचे पाणी निघत नसल्याने दुर्गंधी वाढली. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर मनपाने या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बोट दाखवले आहे. त्यांना पत्र देण्यात आले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पीव्हीआर चौक ते औसा रोड हा रस्ता करीत असताना शहरातून बाहेर जाणाऱ्या नाल्यास बॉक्स कल्वर्ट बांधणे आवश्यक होते, परंतू तसे झाले नाही. आपल्या रेन वॉटरचा बेड लेवलसुध्दा उंच झाला आहे. त्यामुळे शहरातील रोडलगत पाणी साचून घाण पाण्याचे तळे साचत आहेत. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. साचलेले घाण पाणी वाहून नेण्यासाठी आपण त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे महामार्ग विभागाला देण्यात आलेल्या पत्रात मनपाचे शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी नमूद केले आहे.

विराट नगरात शिरते पाणी...खाडगाव रिंगरोडलगत रामरहिम नगर, विराट नगर भागात जवळपास तीन एकरावर जागेत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. पाऊस झाला की विराट नगर येथील जवळपास पाच ते सहा जणांच्या घरात पाणी शिरते. शिवाय, खाडगाव स्मशानभूमीसमोर मुख्य रस्त्याने पाणी वाहते. पाणी निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

रस्ता कामात नळ्या टाकणे चुकले...राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असताना पाण्याचा निचरा करण्यासाठी नळ्या टाकण्यात आल्या आहेत. नळ्या न टाकता बॉक्स कल्वर्ट पध्दतीचे पूल बांधले असते तर सहजपणे पाणी निचरा झाला असता. बेडची उंची वाढल्याने पाणी जात नाही, आता या चुका सुधारणे गरजेचे असले तरी पुढाकार घ्यायचा कोण, असा प्रश्न आहे. मनपा, महामार्गविभागाकडे बोट दाखवत आहे.

नागरिकांच्या जिवाशी खेळ...मनपा, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या खेळात नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळत आहे. बारमाही पाणी थांबलेले असतानाही कोणी दखल घेत नाही. शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठविले. या पत्राची महामार्ग विभाग कधी दखल घेणार असा प्रश्न आहे. सध्या तरी या भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका