शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या जिवाशी खेळ! दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी लातूर मनपाचे महामार्गाकडे बोट

By संदीप शिंदे | Updated: July 8, 2023 17:57 IST

खाडगाव रिंगरोडलगत रामरहिम नगर, विराट नगर भागात जवळपास तीन एकरावर जागेत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे.

लातूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे लातूर शहरालगत अनेक भागातील मनपाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी जमा होत आहे. पावसाचे पाणी निघत नसल्याने दुर्गंधी वाढली. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर मनपाने या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बोट दाखवले आहे. त्यांना पत्र देण्यात आले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पीव्हीआर चौक ते औसा रोड हा रस्ता करीत असताना शहरातून बाहेर जाणाऱ्या नाल्यास बॉक्स कल्वर्ट बांधणे आवश्यक होते, परंतू तसे झाले नाही. आपल्या रेन वॉटरचा बेड लेवलसुध्दा उंच झाला आहे. त्यामुळे शहरातील रोडलगत पाणी साचून घाण पाण्याचे तळे साचत आहेत. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. साचलेले घाण पाणी वाहून नेण्यासाठी आपण त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे महामार्ग विभागाला देण्यात आलेल्या पत्रात मनपाचे शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी नमूद केले आहे.

विराट नगरात शिरते पाणी...खाडगाव रिंगरोडलगत रामरहिम नगर, विराट नगर भागात जवळपास तीन एकरावर जागेत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. पाऊस झाला की विराट नगर येथील जवळपास पाच ते सहा जणांच्या घरात पाणी शिरते. शिवाय, खाडगाव स्मशानभूमीसमोर मुख्य रस्त्याने पाणी वाहते. पाणी निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

रस्ता कामात नळ्या टाकणे चुकले...राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असताना पाण्याचा निचरा करण्यासाठी नळ्या टाकण्यात आल्या आहेत. नळ्या न टाकता बॉक्स कल्वर्ट पध्दतीचे पूल बांधले असते तर सहजपणे पाणी निचरा झाला असता. बेडची उंची वाढल्याने पाणी जात नाही, आता या चुका सुधारणे गरजेचे असले तरी पुढाकार घ्यायचा कोण, असा प्रश्न आहे. मनपा, महामार्गविभागाकडे बोट दाखवत आहे.

नागरिकांच्या जिवाशी खेळ...मनपा, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या खेळात नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळत आहे. बारमाही पाणी थांबलेले असतानाही कोणी दखल घेत नाही. शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठविले. या पत्राची महामार्ग विभाग कधी दखल घेणार असा प्रश्न आहे. सध्या तरी या भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका