शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

निलंगा पंचायत समितीतर्फे ८५ हजार वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

शासनाकडून पावसाळा सुरू झाला की, दरवर्षी झाडे लावण्याचे उदिष्ट ग्रामपंचायतीला दिले जाते. झाडाची लागवड ही केली जाते. मात्र, ही ...

शासनाकडून पावसाळा सुरू झाला की, दरवर्षी झाडे लावण्याचे उदिष्ट ग्रामपंचायतीला दिले जाते. झाडाची लागवड ही केली जाते. मात्र, ही झाडे जगण्यापेक्षा सुकून जाण्याचे प्रमाण अधिक असते. लावलेले वृक्ष टिकत नाहीत. त्याची म्हणावी तशी जोपासना केली होत नाही. यंदा जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह सोळुंके यांनी प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. आनंद घनवन (मियावाकी) योजनेतून निलंगा पंचायत समितीने उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड केली आहे. एक बाय एक फूट खड्डा खोदून तीन प्रकारचे वृक्ष लावण्यात आले असून, एक वृक्ष जोमात वाढणारे, एक मध्यम व एक कमी अशा जातीच्या वृक्षाची निवड करण्यात आली आहे. अशा लागवड पध्दतीमुळे ज्यामध्ये सूर्य प्रकाश खेचण्याची स्पर्धा लागते व झाडे जगण्याची टक्केवारी वाढते.

येथील पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ५०० झाडे प्रति साईट लावण्यासाठी ५० ठिकाणे दिली होती. गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ७५ साईट वरती वृक्षारोपण करण्यात आले असून, प्रत्येक साईट वरती कमीत कमी ५०० ते ३ हजार झाडे लावली आहेत. असे एकूण ८५ हजार झाडे लावली आहेत. प्रत्येक ठिकाणी ड्रिप एरिगेशन करून पाण्याची सुविधा केली आहे.

यामध्ये तालुक्यातील मसोबावाडी, झरी, आंबेगाव-मसलगा, येळणूर, सरवडी, कासारसिरशी, लांबोटा, औराद शहाजानी, तगरखेडा, सावरी, नदीहत्तरगा, नणंद, मदनसुरी यासह आदी गावांचा समावेश आहे.

झाडे जगवली नाही तर कारवाई...

प्रत्येक ठिकाणी पाण्याची सुविधा करून वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायतीला त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांनी यंदा लागवड केलेली झाडे जर नाही जगवली तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी दिली.

कॅप्शन : राज्य शासनाच्या आनंद घनवन योजनेतून निलंगा पंचायत समितीला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षारोपण केले आहे. या लागवडीची पाहणी उपमुख्य कार्यकारी आधिकारी उदयसिंह सोळुंके, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केली.