शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

खडीने डागडुजी केलेले खड्डे पुन्हा उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

अहमदपूर : सततच्या आंदोलनामुळे महामार्ग प्राधिकरणाने येथील महामार्गावरील खड्डे बुजविले. मात्र, अवजड वाहन धावल्याने पुन्हा खडी उघडी पडली आहे. ...

अहमदपूर : सततच्या आंदोलनामुळे महामार्ग प्राधिकरणाने येथील महामार्गावरील खड्डे बुजविले. मात्र, अवजड वाहन धावल्याने पुन्हा खडी उघडी पडली आहे. त्यामुळे महामार्गास पूर्वीची अवस्था आली आहे. परिणामी, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांनी या स्थितीची पाहणी केली आहे.

लातूर-नांदेड हा महामार्ग अहमदपूर शहरातून जातो. या महामार्गावरील खड्डे पाहता हा महामार्ग आहे की, खेडेगावचा रस्ता अशी स्थिती आहे. दुरुस्तीसाठी दोन महिन्यांपासून निवेदने देऊन आंदोलने करूनही महामार्ग प्राधिकरणने लक्ष दिले नाही. मात्र, आता संबंधित गुत्तेदाराला आदेश देण्यात आल्याने संबंधित गुत्तेदाराने केवळ मोठ्या खड्ड्यांमध्ये खडी टाकून डागडुजी केली. परंतु, अवजड वाहनांच्या रहदारीमुळे खड्ड्यांमधील खडी उघडी पडली आहे. परिणामी, रस्त्यास पूर्वीची स्थिती आली आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

१५ दिवसांपूर्वी याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुनील पाटील यांना प्रत्यक्ष जागेवर आणून खड्डे भरण्याच्या दर्जाविषयी विचारणा करून तक्रार केली होती. मात्र, महामार्ग प्राधिकरणच्या कामाच्या दर्जात फारसा फरक पडला नाही. केवळ २० कि.मी.वरील खड्डे बुजविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. उर्वरित ठिकाणचे लवकर खड्डे बुजविले जातात. त्यामुळे संभ्रमावस्था आहे. दरम्यान, टाकलेल्या खडीवर काही दुचाकीस्वार घसरून पडल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

गुत्तेदाराने अहमदपूर ते शिरूर ताजबंद मार्गावरील काही खड्डे बुजविले असले तरी अहमदपूर सांगवी मार्गावरील खड्डे अजून आहेत. याबाबतच्या तक्रारी प्राप्त होताच उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच दर्जाविषयी गुत्तेदारास सूचना केल्या. तसेच शिरूर ते चापोली या मार्गावर अजूनपर्यंत काम केले नाही. ७७ कि.मी.पैकी ३५ कि.मी.चे काम अजूनही शिल्लक आहे.

खडी टाकल्यानंतर डांबरीकरण...

महामार्गावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी अगोदर खडी टाकण्यात येत आहे. दोन दिवसांनंतरचा डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे गुत्तेदाराकडून सांगण्यात आले.

७७ पैकी ३५ कि.मी.चे काम...

गुत्तेदाराने ७७ पैकी केवळ ३५ कि.मी.चे काम पूर्ण केले आहे. माळेगाव ते चापोली दरम्यानचे खड्डे अद्यापही आहेत. रस्त्याच्या दर्जाविषयी पाहणी करून महामार्ग प्राधिकरणला सूचना मी स्वतः सूचना केल्या आहेत. दर्जा सुधारणाविषयी पत्रव्यवहार केला असल्याचे उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.