शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

खडीने डागडुजी केलेले खड्डे पुन्हा उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

अहमदपूर : सततच्या आंदोलनामुळे महामार्ग प्राधिकरणाने येथील महामार्गावरील खड्डे बुजविले. मात्र, अवजड वाहन धावल्याने पुन्हा खडी उघडी पडली आहे. ...

अहमदपूर : सततच्या आंदोलनामुळे महामार्ग प्राधिकरणाने येथील महामार्गावरील खड्डे बुजविले. मात्र, अवजड वाहन धावल्याने पुन्हा खडी उघडी पडली आहे. त्यामुळे महामार्गास पूर्वीची अवस्था आली आहे. परिणामी, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकाऱ्यांनी या स्थितीची पाहणी केली आहे.

लातूर-नांदेड हा महामार्ग अहमदपूर शहरातून जातो. या महामार्गावरील खड्डे पाहता हा महामार्ग आहे की, खेडेगावचा रस्ता अशी स्थिती आहे. दुरुस्तीसाठी दोन महिन्यांपासून निवेदने देऊन आंदोलने करूनही महामार्ग प्राधिकरणने लक्ष दिले नाही. मात्र, आता संबंधित गुत्तेदाराला आदेश देण्यात आल्याने संबंधित गुत्तेदाराने केवळ मोठ्या खड्ड्यांमध्ये खडी टाकून डागडुजी केली. परंतु, अवजड वाहनांच्या रहदारीमुळे खड्ड्यांमधील खडी उघडी पडली आहे. परिणामी, रस्त्यास पूर्वीची स्थिती आली आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

१५ दिवसांपूर्वी याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुनील पाटील यांना प्रत्यक्ष जागेवर आणून खड्डे भरण्याच्या दर्जाविषयी विचारणा करून तक्रार केली होती. मात्र, महामार्ग प्राधिकरणच्या कामाच्या दर्जात फारसा फरक पडला नाही. केवळ २० कि.मी.वरील खड्डे बुजविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. उर्वरित ठिकाणचे लवकर खड्डे बुजविले जातात. त्यामुळे संभ्रमावस्था आहे. दरम्यान, टाकलेल्या खडीवर काही दुचाकीस्वार घसरून पडल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

गुत्तेदाराने अहमदपूर ते शिरूर ताजबंद मार्गावरील काही खड्डे बुजविले असले तरी अहमदपूर सांगवी मार्गावरील खड्डे अजून आहेत. याबाबतच्या तक्रारी प्राप्त होताच उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच दर्जाविषयी गुत्तेदारास सूचना केल्या. तसेच शिरूर ते चापोली या मार्गावर अजूनपर्यंत काम केले नाही. ७७ कि.मी.पैकी ३५ कि.मी.चे काम अजूनही शिल्लक आहे.

खडी टाकल्यानंतर डांबरीकरण...

महामार्गावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी अगोदर खडी टाकण्यात येत आहे. दोन दिवसांनंतरचा डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे गुत्तेदाराकडून सांगण्यात आले.

७७ पैकी ३५ कि.मी.चे काम...

गुत्तेदाराने ७७ पैकी केवळ ३५ कि.मी.चे काम पूर्ण केले आहे. माळेगाव ते चापोली दरम्यानचे खड्डे अद्यापही आहेत. रस्त्याच्या दर्जाविषयी पाहणी करून महामार्ग प्राधिकरणला सूचना मी स्वतः सूचना केल्या आहेत. दर्जा सुधारणाविषयी पत्रव्यवहार केला असल्याचे उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.