शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

शेंगदाणे, खाद्यतेलाचे दर गगनाला; भाजीपाल्यांचे दर मात्र आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST

लातूरच्या मंडईत भाजीपाल्यांची आवक जेमतेम आहे. परिणामी, शेवगा प्रति किलो १०० रुपयांच्या घरात आहे. तो गेल्या आठवड्यात १४० रुपयांवर ...

लातूरच्या मंडईत भाजीपाल्यांची आवक जेमतेम आहे. परिणामी, शेवगा प्रति किलो १०० रुपयांच्या घरात आहे. तो गेल्या आठवड्यात १४० रुपयांवर होता. हिरवी मिरची ३०, फुलगोबी ६, पत्ताकोबी ५, गाजर २०, हिरा काकडी २०, भेंडी २०, वांगे २६, कारले ३०, दोडका ३०, भोपळा १० रुपये, हिरवी काकडी २०, गवार ६०, चवळी ५०, शेवगा १००, वरणा ३०, शिमला मिरची २० रुपये, कांदे प्रति किलो ३५ रुपये, बटाटे २०, पालक १०, शेपू १५, मेथी ७ रुपये पेंढी आणि वटाणा ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. किराणामध्ये साखर ३५ रुपये, रवा, मैदा ३०, पोहे ४०, दाळवं ८०, तूरडाळ, मूगडाळ ११०, चनाडाळ ७०, उडीद डाळ १२०, मसूर ८०, शाबू ६०, भगर ८० रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे.

किराणा मालामध्ये खाद्य तेलापाठोपाठ शेंगदाणे आणि डाळींचे भाव वधारले आहेत. यामध्ये तूर आणि मूगडाळ ११०, उडीद डाळ १२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मसूरडाळ ८०, तर चनाडाळ ७० रुपये किलोने मिळत आहे. थंडीचे दिवस असल्याने सुका मेव्याचेही भाव वधारले आहेत.

गेल्या दोन आठवड्यापासून भाजीपाल्यांचे दर आवाक्यात आहेत. भावही स्थिर आहेत. अलिकडे आवकही जेमतेम होत असून, कांदा ४० वरून ३५ वर आला आहे. शिवाय, मुळा, वांगी, कारले, दोडके, वरणा, शेवगा यांचेही भाव बऱ्यापैकी आहेत. दर आवाक्यात असल्याने सामान्यांना दिलासा आहे.

किराणा मालात खाद्यतेल जैसे थे आहे. प्रति किलो १०० रुपयावरून ते थेट १५० रुपयांच्या घरात आहे. त्यापाठोपाठ उडीद डाळ आणि शेंगदाणेही महागले आहेत. तर साखर जैसे थे आहे.

- तुराब शेख,

दुकानदार