शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

दहावी-बारावीच्या परीक्षांना पालकांची संमती; हव्यात उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST

लातूर : दहावी - बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बहुतांश पालकांची ...

लातूर : दहावी - बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बहुतांश पालकांची सहमती असली तरी त्यांना कोरोनाची चिंता भेडसावत आहे.

लातूर जिल्ह्यातून दहावीसाठी १ लाख ५ हजार ४९६, तर बारावीसाठी ७७ हजार ३६० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. या मुलांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य असल्याचे सांगून शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही पालकांशी चर्चा केली असता पालकांनीही ऑफलाईन परीक्षेला सहमती दर्शविली आहे. परंतु, त्याचबरोबर कोरोनाची चिंताही व्यक्त केली आहे. उपाययोजना आणि खबरदारी घेण्याचे सुचविले आहे.

शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय योग्य असून, विद्यार्थी हित जपणारा आहे. परंतु, सध्या कोरोनाचे संकट मोठे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांना खबरदारीच्या उपाययोजना व त्यावर लक्ष ठेवायला लावणे गरजेचे आहे. उपाययोजनेची चिंता आहे.

- प्रा. भास्कर मोरे, उदगीर

कोरोनामुळे यंदाच्या परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या. परंतु, शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर योग्य त्या उपाययोजना करून पालकांना चिंतामुक्त करणे आवश्यक आहे.

- शैलजा मुचाटे, लातूर

परीक्षा केंद्रांवर पालकांची गर्दी होऊ नये. पाल्यांना स्वत:ची काळजी घेण्यासंदर्भात योग्य ती दक्षता घेण्याबाबतचे मार्गदर्शन करावे. परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टन्स असावे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व त्या उपाययोजना करून परीक्षा घेण्यास काहीच हरकत नाही.

- जकीखान कायमखानी, लातूर

कोरोनाची चिंता आहे. सध्या भीती थोडी दूर झालेली आहे. गतवर्षी भीतीपोटीच अकरावीची परीक्षा ऑनलाईन झाली. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. कोरोना जात असल्याचे वाटत असतानाच पुन्हा रुग्ण वाढत आहेत. तरी खबरदारी घेऊन परीक्षा घ्याव्यात.

- रवींद्र गोसावी, बोरफळ

विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने परीक्षा झाल्याच पाहिजेत. परंतु, कोरोनाची भीती आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र व परिसरात निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. फिजिकल डिस्टन्सनुसार परीक्षार्थींची व्यवस्था करावी. जेणेकरून परीक्षा भीतीमुक्त वातावरणात देता येईल.

- विष्णू मोरे, अहमदपूर

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आले आहे. परंतु, सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता वाटत आहे. तरीही सर्व उपाययोजना आणि नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यास हरकत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे.

- सुनीता नाडे, लातूर