शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' सीन; आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
10
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
11
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
13
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
14
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
15
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
16
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
17
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
18
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
20
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

दहावी-बारावीच्या परीक्षांना पालकांची संमती; हव्यात उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST

लातूर : दहावी - बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बहुतांश पालकांची ...

लातूर : दहावी - बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बहुतांश पालकांची सहमती असली तरी त्यांना कोरोनाची चिंता भेडसावत आहे.

लातूर जिल्ह्यातून दहावीसाठी १ लाख ५ हजार ४९६, तर बारावीसाठी ७७ हजार ३६० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. या मुलांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य असल्याचे सांगून शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही पालकांशी चर्चा केली असता पालकांनीही ऑफलाईन परीक्षेला सहमती दर्शविली आहे. परंतु, त्याचबरोबर कोरोनाची चिंताही व्यक्त केली आहे. उपाययोजना आणि खबरदारी घेण्याचे सुचविले आहे.

शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय योग्य असून, विद्यार्थी हित जपणारा आहे. परंतु, सध्या कोरोनाचे संकट मोठे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांना खबरदारीच्या उपाययोजना व त्यावर लक्ष ठेवायला लावणे गरजेचे आहे. उपाययोजनेची चिंता आहे.

- प्रा. भास्कर मोरे, उदगीर

कोरोनामुळे यंदाच्या परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या. परंतु, शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर योग्य त्या उपाययोजना करून पालकांना चिंतामुक्त करणे आवश्यक आहे.

- शैलजा मुचाटे, लातूर

परीक्षा केंद्रांवर पालकांची गर्दी होऊ नये. पाल्यांना स्वत:ची काळजी घेण्यासंदर्भात योग्य ती दक्षता घेण्याबाबतचे मार्गदर्शन करावे. परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टन्स असावे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व त्या उपाययोजना करून परीक्षा घेण्यास काहीच हरकत नाही.

- जकीखान कायमखानी, लातूर

कोरोनाची चिंता आहे. सध्या भीती थोडी दूर झालेली आहे. गतवर्षी भीतीपोटीच अकरावीची परीक्षा ऑनलाईन झाली. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. कोरोना जात असल्याचे वाटत असतानाच पुन्हा रुग्ण वाढत आहेत. तरी खबरदारी घेऊन परीक्षा घ्याव्यात.

- रवींद्र गोसावी, बोरफळ

विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने परीक्षा झाल्याच पाहिजेत. परंतु, कोरोनाची भीती आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र व परिसरात निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. फिजिकल डिस्टन्सनुसार परीक्षार्थींची व्यवस्था करावी. जेणेकरून परीक्षा भीतीमुक्त वातावरणात देता येईल.

- विष्णू मोरे, अहमदपूर

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आले आहे. परंतु, सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता वाटत आहे. तरीही सर्व उपाययोजना आणि नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यास हरकत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे.

- सुनीता नाडे, लातूर