शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या परीक्षांना पालकांची संमती; हव्यात उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST

लातूर : दहावी - बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बहुतांश पालकांची ...

लातूर : दहावी - बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बहुतांश पालकांची सहमती असली तरी त्यांना कोरोनाची चिंता भेडसावत आहे.

लातूर जिल्ह्यातून दहावीसाठी १ लाख ५ हजार ४९६, तर बारावीसाठी ७७ हजार ३६० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. या मुलांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य असल्याचे सांगून शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही पालकांशी चर्चा केली असता पालकांनीही ऑफलाईन परीक्षेला सहमती दर्शविली आहे. परंतु, त्याचबरोबर कोरोनाची चिंताही व्यक्त केली आहे. उपाययोजना आणि खबरदारी घेण्याचे सुचविले आहे.

शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय योग्य असून, विद्यार्थी हित जपणारा आहे. परंतु, सध्या कोरोनाचे संकट मोठे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांना खबरदारीच्या उपाययोजना व त्यावर लक्ष ठेवायला लावणे गरजेचे आहे. उपाययोजनेची चिंता आहे.

- प्रा. भास्कर मोरे, उदगीर

कोरोनामुळे यंदाच्या परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या. परंतु, शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर योग्य त्या उपाययोजना करून पालकांना चिंतामुक्त करणे आवश्यक आहे.

- शैलजा मुचाटे, लातूर

परीक्षा केंद्रांवर पालकांची गर्दी होऊ नये. पाल्यांना स्वत:ची काळजी घेण्यासंदर्भात योग्य ती दक्षता घेण्याबाबतचे मार्गदर्शन करावे. परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टन्स असावे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व त्या उपाययोजना करून परीक्षा घेण्यास काहीच हरकत नाही.

- जकीखान कायमखानी, लातूर

कोरोनाची चिंता आहे. सध्या भीती थोडी दूर झालेली आहे. गतवर्षी भीतीपोटीच अकरावीची परीक्षा ऑनलाईन झाली. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. कोरोना जात असल्याचे वाटत असतानाच पुन्हा रुग्ण वाढत आहेत. तरी खबरदारी घेऊन परीक्षा घ्याव्यात.

- रवींद्र गोसावी, बोरफळ

विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने परीक्षा झाल्याच पाहिजेत. परंतु, कोरोनाची भीती आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र व परिसरात निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. फिजिकल डिस्टन्सनुसार परीक्षार्थींची व्यवस्था करावी. जेणेकरून परीक्षा भीतीमुक्त वातावरणात देता येईल.

- विष्णू मोरे, अहमदपूर

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आले आहे. परंतु, सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता वाटत आहे. तरीही सर्व उपाययोजना आणि नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यास हरकत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे.

- सुनीता नाडे, लातूर