शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

पाेलिसांनी हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

एखाद्या ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला असेल तर पाेलीस ठाण्यात धावत आलेल्या तक्रारदाराला संबंधित ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला जाताे. प्रत्यक्षात ...

एखाद्या ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला असेल तर पाेलीस ठाण्यात धावत आलेल्या तक्रारदाराला संबंधित ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला जाताे. प्रत्यक्षात सीआरपीसी १४५ प्रमाणे तक्रारदार ज्या पाेलीस ठाण्यात गेला आहे तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या ठाण्याची असल्यास नंतर ताे अर्ज त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. मात्र तसे घडतच नाही. यातून तक्रारदारांची मात्र नाहक हेळसांड हाेत असल्याचे समाेर आले आहे.

ही घ्या उदाहरणे...

तक्रार नाेंदविलीच नाही...

माझा माेबाइल चाेरीला गेला. याबाबत मी तक्रार देण्यासाठी गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गेलाे. ती हद्द शिवाजीनगर ठाण्यात येते, असे सांगून मला तेथे तक्रार देण्यासाठी सांगण्यात आले. शिवाजीनगरला आलाे तर येथेही हद्द कुठली आहे, यावरून प्रतिप्रश्न विचारण्यात आला. या दाेन ठाण्यांच्या हद्दीत माझी तक्रार काही नाेंदविण्यात आली नाही, असे तक्रारदाराने सांगितले.

हद्दीवरून तक्रारदार त्रस्त...

गूळ मार्केट आणि कव्हा नका परिसर दाेन पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत विभागाला आहे. चाैकात घडलेली घटना विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात येते आणि चाैकापासून ते गूळ मार्केट चाैकापर्यंतची हद्द गांधी चाैक पाेलीस ठाण्यात येते. अशावेळी हद्दीचा वाद उद्भवला की मग तक्रारदार चक्रावून जातात. यातून तक्रार देण्यास पुढे येत नाहीत.

...आणि तक्रार नाेंदवून घेतलीच नाही

गुन्हा कुठे घडला यावरच पहिल्यांदा पाेलीस ठाण्यात अधिक चर्चा केली जाते. काेणाची हद्द आहे, हे आधी ठरविले जाते. या पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत तक्रारदार, फिर्यादींना मात्र नाहक त्रास सहन करावा लागताे. अशावेळी कंटाळलेल्या तक्रारदारांकडून बऱ्याचदा तक्रार देण्याची मानसिकता राहत नाही. याच हद्दीच्या वादातून माझी तक्रार नाेंदवूनच घेतली नाही, असेही एका तक्रारदाराने सांगितले.