शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक असून, दिवसागणिक दीड हजाराच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. त्यातच ऑक्सिजन, रेमडेसिविरचाही ...

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक असून, दिवसागणिक दीड हजाराच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. त्यातच ऑक्सिजन, रेमडेसिविरचाही तुटवडा जाणवत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १५ हजार ३७४ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणाचे असून, गृह विलगीकरणात सर्वाधिक रुग्ण आहेत. दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांना ही चणचण भासत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार ५६६ रुग्ण आढळले. त्यापैकी ३७ हजार ३०८ बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या बाधित असलेल्या १५ हजार ३७४ रुग्णांपैकी ४१६९ रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत. यातील मध्यम; परंतु ऑक्सिजनवर १२६८ रुग्ण आहेत. २६३ आयसीयू, ६३ व्हेंटिलेटरवर आणि २०३ बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत.

ऑक्सिजन : १० हजार लिटर लिक्विडचा पुरवठा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सध्या दहा हजार लिटर लिक्विडचा पुरवठा होत आहे. दररोज आठ हजार लिटर लिक्विड लागत आहे, तर जिल्ह्यात साडेतीन हजार जम्बो सिलिंडर लागत आहेत. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने ऑक्सिजनची चणचण भासत आहे; परंतु आरोग्य प्रशासन मोठी कसरत करून ऑक्सिजन मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. शासकीय महाविद्यालयात सर्वाधिक रुग्ण असल्याने तेथे पुरवठा आहे.

रेमडेसिविर : न्यायिक पद्धतीने रेमडेसिविरचा होतो पुरवठा

ज्या रुग्णांना गरज आहे, अशा रुग्णांनाच रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून, न्यायिक पद्धतीने या इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसला तरी न्यायिक पद्धत अवलंबली जात असल्याने गरजू रुग्णांना मिळावे म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. दररोज न्यायिक पद्धतीने या इंजेक्शनचे वाटप केले जात आहे.

लसीकरण : साठा नसल्याने केवळ ९९ केंद्रे सुरू

जिल्ह्यातील लसींचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. १७१ केंद्रांपैकी कालपर्यंत फक्त ९९ केंद्रांवर जेमतेम १२०० ते १३०० डोस उपलब्ध होते. प्रशासनाने १ लाख ८० हजार डोसची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८९ हजार १८८ व्यक्तींनी लस घेतली आहे. यातील १६ हजार १७० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. मात्र, लसीचा तुटवडा आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जिल्ह्यात सुरू असतानाच कोरोना प्रतिबंधक लसीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. प्रारंभी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, काही उपकेंद्रे आणि खाजगी मिळून १९१ केंद्रांवर लस दिली जात होती; परंतु पुरवठा कमी झाल्यामुळे सध्या ७१ केंद्रांवर लस देणे सुरू आहे. जिल्ह्यात १५ ते २० हजार डोस दिवसाला देण्याची क्षमता आहे. मात्र, लसीचा प्रचंड तुटवडा आहे.