शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

माहिती दिलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार विमा; औसा तालुक्यातील हजाराे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST

यंदाच्या खरीप हंगामात बेलकुंडसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टीमुळे काढणीअगोदर व काढणीपश्‍चात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी ...

यंदाच्या खरीप हंगामात बेलकुंडसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टीमुळे काढणीअगोदर व काढणीपश्‍चात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी तालुक्यातील फक्त १४ हजार पाचशे शेतकऱ्यांचे ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने नुकसानीचे अर्ज स्वीकारण्यात आले, तर एकूण १० हजार अर्ज शेतकऱ्यांनी अज्ञानापोटी काही चुकीचे शब्द लिहिल्याने कंपनीकडून बाद ठरवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. नुकसानीची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा परतावा मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. यापैकी येथील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे जमा होण्यास प्रारंभ झाला आहे. जे शेतकरी विमा कंपनीला नुकसानीची माहिती देऊ शकले नाहीत, असे शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तांनी कंपनीला शासकीय यंत्रणांनी केलेले नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरून विमा परतावा द्यावा, असा आदेश दिला आहे. असे असतानाही या आदेशाला संबंधित कंपनीने केराची टोपली दाखवली आहे.

विमा कंपनीकडून नियमांची जनजागृती आवश्यक

७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती देणे बंधनकारक असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे, तर तांत्रिक बाबतीत शेतकऱ्यांना प्रबाेधन करण्याची गरज आहे.